शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा खर्च करण्याची वेळ या संपामुळे प्रवाशांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. त्यात अमरावती आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबरपासून सहभाग घेतला आहे. राज्य शासनात विलिनीकरण होईस्तोवर कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटना व संघर्ष ग्रुपमार्फत संप पुकारण्यात आला आहे.ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा खर्च करण्याची वेळ या संपामुळे प्रवाशांवर ओढावली आहे. या संपात संजय मालविय, राजेश विजयकर, संजय बंसोड, अशोक बोरकर, आशिष वलिवकर, शिवदास भारती, विनोद ढोलवाढे, बाळासाहेब सावळे, सत्यम सोनोने, अजय तायडे, प्रवीण ढोके, राहुल उईके, अलिम, प्रशांत सकसुळे, गोपाल कोहळे, अमोल क्षीरसागर, अ. हनिफ, सतीश कडू, हरिओम इंगोले, अशोक आमझरे यांच्या २०८ कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूटअमरावती-दर्यापूर एसटी बसची तिकीट ९० रुपये असताना संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहनधारकांद्वारा चक्क १५० रुपये आकारण्यात येत आहे. नाईलाज म्हणून प्रवाशांना दीडशे रुपये देऊनही दाटीवाटीने प्रवास करावा लागल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

अपघात विम्याची जमा रक्कम गेली कुठे? तत्कालीन राज्यपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये प्रत्येक प्रवासी तिकिटावर अपघात विम्यासाठी एक रुपया जमा करण्याचा निर्णय झाला. त्याद्वारा प्रतिदिवस राज्यभरातून ६० लाख रुपये जमा होत आहे. ती रक्कम आहे कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप