शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:29 IST

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला. पावसाच्या प्रदीर्घ तुटीमुळे खरिपाची मूग, उडीद व सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा हल्ला झालाय. परिणामी पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांची घट होणार आहे. त्यामुळे खरीप पीकविमा काढलेल्या सहा लाख शेतक-यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी यंदाच्या खरीप हंगामातील नऊ पिकांना विम्याचे कवच देण्यात आले. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. ही योजना कर्जदार शेतक-यांसाठी सक्तीची, तर गैरकर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक होती. विभागातील ६ लाख ३ हजार ६५७ शेतक-यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३१ लाख ६२ हजार ५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसात खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांचे मूग व उडिदाचे पीक हातचे गेले. पावसाच्या सततच्या खंडामुळे सोयाबीन बाधित झाले, तर काढणीच्या काळात अवकाळी पावसामुळे प्रतवारी खराब झाली. एफएक्यू ग्रेड असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरदेखील शेतक-यांना माघारी पाठविले जाते. कपाशीची तीच गत आहे. बीटीचे बोंड गुलाबी अळीने पोखरल्यामुळे कापसाचे सरासरी उत्पादन ५६ टक्क्यांनी घटले व दर्जाही निकृष्ट झाला. यंदाच्या हंगामात शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याला विम्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे.असा आहे जिल्हानिहाय सहभागपीकविमा योजनेत विभागात ६,०३,६५७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,६६,०४५, अकोला १,०३,०५१, वाशिम ८३,०५६, अमरावती ९५,९८२, तर यवतमाळ जिल्ह्यात १,५५,५२३ शेतकºयांचा सहभाग आहे. यामध्ये २,००,८३३ शेतक-यांनी आॅनलाइन, ४३,३६३ शेतक-यांनी जनसुविधा केंद्रात, १,९४,४७५ शेतकरी कर्जदार असल्याने सक्तीने, तर १,६४,९८६ गैरकर्जदार शेतक-यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.पावसाळ्यात ३६ दिवसच पाऊसयंदा विभागात सरासरी ७६ टक्के पाऊस पडल्याने २४ टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवसच पाऊस पडला. यामध्ये जून महिन्यात ९ दिवस, जुलै १२, आॅगस्ट ९, सप्टेंबर ८, तर आॅक्टोबर महिन्यात फक्त ८ दिवसच पाऊस पडला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. विभागातील पिकांचे सरासरी ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती