शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:29 IST

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला. पावसाच्या प्रदीर्घ तुटीमुळे खरिपाची मूग, उडीद व सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा हल्ला झालाय. परिणामी पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांची घट होणार आहे. त्यामुळे खरीप पीकविमा काढलेल्या सहा लाख शेतक-यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी यंदाच्या खरीप हंगामातील नऊ पिकांना विम्याचे कवच देण्यात आले. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. ही योजना कर्जदार शेतक-यांसाठी सक्तीची, तर गैरकर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक होती. विभागातील ६ लाख ३ हजार ६५७ शेतक-यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३१ लाख ६२ हजार ५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसात खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांचे मूग व उडिदाचे पीक हातचे गेले. पावसाच्या सततच्या खंडामुळे सोयाबीन बाधित झाले, तर काढणीच्या काळात अवकाळी पावसामुळे प्रतवारी खराब झाली. एफएक्यू ग्रेड असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरदेखील शेतक-यांना माघारी पाठविले जाते. कपाशीची तीच गत आहे. बीटीचे बोंड गुलाबी अळीने पोखरल्यामुळे कापसाचे सरासरी उत्पादन ५६ टक्क्यांनी घटले व दर्जाही निकृष्ट झाला. यंदाच्या हंगामात शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याला विम्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे.असा आहे जिल्हानिहाय सहभागपीकविमा योजनेत विभागात ६,०३,६५७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,६६,०४५, अकोला १,०३,०५१, वाशिम ८३,०५६, अमरावती ९५,९८२, तर यवतमाळ जिल्ह्यात १,५५,५२३ शेतकºयांचा सहभाग आहे. यामध्ये २,००,८३३ शेतक-यांनी आॅनलाइन, ४३,३६३ शेतक-यांनी जनसुविधा केंद्रात, १,९४,४७५ शेतकरी कर्जदार असल्याने सक्तीने, तर १,६४,९८६ गैरकर्जदार शेतक-यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.पावसाळ्यात ३६ दिवसच पाऊसयंदा विभागात सरासरी ७६ टक्के पाऊस पडल्याने २४ टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवसच पाऊस पडला. यामध्ये जून महिन्यात ९ दिवस, जुलै १२, आॅगस्ट ९, सप्टेंबर ८, तर आॅक्टोबर महिन्यात फक्त ८ दिवसच पाऊस पडला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. विभागातील पिकांचे सरासरी ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती