शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:29 IST

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला. पावसाच्या प्रदीर्घ तुटीमुळे खरिपाची मूग, उडीद व सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा हल्ला झालाय. परिणामी पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांची घट होणार आहे. त्यामुळे खरीप पीकविमा काढलेल्या सहा लाख शेतक-यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी यंदाच्या खरीप हंगामातील नऊ पिकांना विम्याचे कवच देण्यात आले. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. ही योजना कर्जदार शेतक-यांसाठी सक्तीची, तर गैरकर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक होती. विभागातील ६ लाख ३ हजार ६५७ शेतक-यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३१ लाख ६२ हजार ५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसात खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांचे मूग व उडिदाचे पीक हातचे गेले. पावसाच्या सततच्या खंडामुळे सोयाबीन बाधित झाले, तर काढणीच्या काळात अवकाळी पावसामुळे प्रतवारी खराब झाली. एफएक्यू ग्रेड असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरदेखील शेतक-यांना माघारी पाठविले जाते. कपाशीची तीच गत आहे. बीटीचे बोंड गुलाबी अळीने पोखरल्यामुळे कापसाचे सरासरी उत्पादन ५६ टक्क्यांनी घटले व दर्जाही निकृष्ट झाला. यंदाच्या हंगामात शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याला विम्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे.असा आहे जिल्हानिहाय सहभागपीकविमा योजनेत विभागात ६,०३,६५७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,६६,०४५, अकोला १,०३,०५१, वाशिम ८३,०५६, अमरावती ९५,९८२, तर यवतमाळ जिल्ह्यात १,५५,५२३ शेतकºयांचा सहभाग आहे. यामध्ये २,००,८३३ शेतक-यांनी आॅनलाइन, ४३,३६३ शेतक-यांनी जनसुविधा केंद्रात, १,९४,४७५ शेतकरी कर्जदार असल्याने सक्तीने, तर १,६४,९८६ गैरकर्जदार शेतक-यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.पावसाळ्यात ३६ दिवसच पाऊसयंदा विभागात सरासरी ७६ टक्के पाऊस पडल्याने २४ टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवसच पाऊस पडला. यामध्ये जून महिन्यात ९ दिवस, जुलै १२, आॅगस्ट ९, सप्टेंबर ८, तर आॅक्टोबर महिन्यात फक्त ८ दिवसच पाऊस पडला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. विभागातील पिकांचे सरासरी ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती