शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बहिरम यात्रेत मातीच्या चुली उभारण्याचीही लगबग; पर्यावरणपुरक भांड्यांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 16:59 IST

मध्य प्रदेशातील 'हंडी' ट्रकने दाखल

परतवाडा (चंद्रपूर) : सर्वदूर चर्चेतील बहिरम यात्रेत मध्य प्रदेशातील मातीची हंडी व भांडी ट्रकने दाखल झाली आहेत. यात्रेदरम्यान मिळणारी ही पर्यावरणपूरक हंडी आणि भांडी यात्रेची ओळख असून, यात्रेकरूंसह पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदही तालुक्यातील झल्लार येथून ही हंडी व मातीची भांडी यात्रेत पोहोचली आहे. लहान-मोठ्या आकारात ती आहे. झल्लार येथील मंडळी पूर्वापार वंशपरंपरागत बहिरम यात्रेत दरवर्षी ती विकायला आणतात. यात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला विक्रीकरिता ठेवल्या गेलेली ही मातीची हंडी व भांडी लक्षवेधक ठरली आहेत.

पैशाची हंडी रुपयांत

बहिरम यात्रेत मिळणारी ही मातीची हंडी साठ वर्षांपूर्वी केवळ दहा पैशाला मिळायची. ती आज ५० ते ६० रुपयांनी मिळत आहे. एक पावापासून तर पंधरा किलोंपर्यंतची हंडी यात्रेत विकली जात आहे. आकार आणि क्षमतेनुसार या हंडीच्या भावात चढ-उतार बघायला मिळतो.

भाजीची चवच न्यारी

मातीच्या हंडीतील भाजीची चवच न्यारी असून, हंडीतील भाजीचे शौकीन यात्रेतच हंडी विकत घेतात. त्यात हळद, तेल, मीठ, पाणी टाकून उकळतात. नंतर हे पाणी फेकून त्यात भाजी शिजवतात. या भाजीसोबत जेवायला यात्रेतूनच भाकरी आणि पोळी विकत घेतात. हंडीतील भाजीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याच ठिकाणी ती फोडून टाकतात. यात त्यांच्या वाट्याला सर्वोच्च आनंद येतो. यात्रेत सर्वोच्च आनंद देणारी ही हंडी आता घराघरांत पोचली आहे.

आकर्षक भांडी

हंडीसोबतच यात्रेत मातीच्या फ्लॉवर पॉटसह वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक भांडी विक्रीला आहेत. या आकर्षक भांड्यांनी संक्रांतीच्या वाणातही जागा मिळविली आहे.

मातीच्या चुलीवर अखेरचा हात

बहिरम यात्रेत यात्रेकरूंना चुलीवरचे खास जेवण आणि हंडीतली भाजी उपलब्ध करून देणारे अनेक हॉटेल्स, खानावळी दरवर्षी असतात. यंदा यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकरिता सरळ रेषेत मातीच्या एकापेक्षा अधिक चुली उभारण्याची, बनविण्याची लगबग सुरू आहे. काहींनी त्या उभारल्या असून काही त्यावर अखेरचा हात फिरवीत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती