शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बहिरम येथे शेतकऱ्यांनी कापूस पेटवून केला केंद्र सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:18 IST

शेतमालाला भाव द्या; व्यापारीधार्जिणे धोरण संपवा

परतवाडा (अमरावती) : १९७५ च्या बहिरम कापूसआंदोलनाची ज्योत कायम ठेवण्याकरिता आणि शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याकरिता मंगळवारला शेतकऱ्यांनी बहिरम येथे कापूस पेटविला.

प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीने २४ जानेवारी १९७५ ला बहिराम कापूस आंदोलनात शहीद झालेले शेतकरी विठ्ठलराव दोतोंडे आणि त्यादरम्यानचे प्रेरणादायी ठरलेले नेतृत्व दादासाहेब हावरे, भाऊ साबळे, केशरबाई सिकची, शंकरराव बोबडे, मामराजजी खंडेलवाल, विनायकराव कोरडे, वामनराव खलोकर यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहली. शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन पाळला. बहिरम येथील रेस्ट हाऊस परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जवळपास २०० शेतकऱ्यांनी हजेरी लावली. श्रद्धांजलीपर कार्यक्रम आटोपल्यानंतर या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून कापूस पेटविला.

डोक्यावर कापसाचे गाठोडे....

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कापसाचे गाठोडे आणि हातातील फलक अधिक बोलके ठरलेत. कापसाला भाव मिळालाच पाहिजे, किसान एकता जिंदाबादचे गगनभेदी नारेही आंदोलकांनी लावलेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुरीलाही भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हे नारे लावत त्यांनी केंद्र सरकारचा कापूस उत्पादक धोरणाचा निषेधही याप्रसंगी नोंदविला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूसagitationआंदोलन