शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बहिरम येथे शेतकऱ्यांनी कापूस पेटवून केला केंद्र सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:18 IST

शेतमालाला भाव द्या; व्यापारीधार्जिणे धोरण संपवा

परतवाडा (अमरावती) : १९७५ च्या बहिरम कापूसआंदोलनाची ज्योत कायम ठेवण्याकरिता आणि शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याकरिता मंगळवारला शेतकऱ्यांनी बहिरम येथे कापूस पेटविला.

प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीने २४ जानेवारी १९७५ ला बहिराम कापूस आंदोलनात शहीद झालेले शेतकरी विठ्ठलराव दोतोंडे आणि त्यादरम्यानचे प्रेरणादायी ठरलेले नेतृत्व दादासाहेब हावरे, भाऊ साबळे, केशरबाई सिकची, शंकरराव बोबडे, मामराजजी खंडेलवाल, विनायकराव कोरडे, वामनराव खलोकर यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहली. शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन पाळला. बहिरम येथील रेस्ट हाऊस परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जवळपास २०० शेतकऱ्यांनी हजेरी लावली. श्रद्धांजलीपर कार्यक्रम आटोपल्यानंतर या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून कापूस पेटविला.

डोक्यावर कापसाचे गाठोडे....

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कापसाचे गाठोडे आणि हातातील फलक अधिक बोलके ठरलेत. कापसाला भाव मिळालाच पाहिजे, किसान एकता जिंदाबादचे गगनभेदी नारेही आंदोलकांनी लावलेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुरीलाही भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हे नारे लावत त्यांनी केंद्र सरकारचा कापूस उत्पादक धोरणाचा निषेधही याप्रसंगी नोंदविला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूसagitationआंदोलन