शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2024 22:38 IST

रस्ते, दळणवळणाच्या सुविधांपासून दूरच

जितेंद्र दखने, अमरावती: देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासीयांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र, मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याघ्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यांमुळे अनेक सुविधांचा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्टिव्हिटी, वीज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावांपर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली श्वापदांचा धोका पत्करून, वेळ व पैसा खर्च करून कधी पायी, कधी सायकलने, कधी खासगी वाहनांनी ५ ते १० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानगी मिळत नाही. ही किचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पहाड, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल भाग येथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यांवर एसटीही रस्त्यांवर धावू शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते, पूल, सुरक्षित वळणे असणे आवश्यक आहे. एसटीद्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावांपर्यंत जाण्यासाठी रस्तेच नसून तेथे लहान वाहन कसेतरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले.

दळणवळणाच्या सुविधांअभावी मेळाघाटातील अनेक गावात ना एसटी बस, ना मोबाइल कनेक्टिव्हिटी, ना वीज अशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत. तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु, मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोहोचू शकत नाही. तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात.

अडचणीमुळे कामे शक्य नाही

मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्यांचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरुम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्याअभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही.

सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते, वळण चांगले नसल्याचे आढळले. तेथून चारचाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच आत अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहेत तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही.- प्रवीण काळमेघ, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ अमरावती

टॅग्स :Melghatमेळघाटstate transportएसटीAmravatiअमरावती