शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2024 22:38 IST

रस्ते, दळणवळणाच्या सुविधांपासून दूरच

जितेंद्र दखने, अमरावती: देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासीयांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र, मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याघ्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यांमुळे अनेक सुविधांचा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्टिव्हिटी, वीज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावांपर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली श्वापदांचा धोका पत्करून, वेळ व पैसा खर्च करून कधी पायी, कधी सायकलने, कधी खासगी वाहनांनी ५ ते १० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानगी मिळत नाही. ही किचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पहाड, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल भाग येथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यांवर एसटीही रस्त्यांवर धावू शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते, पूल, सुरक्षित वळणे असणे आवश्यक आहे. एसटीद्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावांपर्यंत जाण्यासाठी रस्तेच नसून तेथे लहान वाहन कसेतरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले.

दळणवळणाच्या सुविधांअभावी मेळाघाटातील अनेक गावात ना एसटी बस, ना मोबाइल कनेक्टिव्हिटी, ना वीज अशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत. तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु, मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोहोचू शकत नाही. तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात.

अडचणीमुळे कामे शक्य नाही

मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्यांचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरुम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्याअभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही.

सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते, वळण चांगले नसल्याचे आढळले. तेथून चारचाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच आत अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहेत तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही.- प्रवीण काळमेघ, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ अमरावती

टॅग्स :Melghatमेळघाटstate transportएसटीAmravatiअमरावती