शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2024 22:38 IST

रस्ते, दळणवळणाच्या सुविधांपासून दूरच

जितेंद्र दखने, अमरावती: देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासीयांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र, मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याघ्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यांमुळे अनेक सुविधांचा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्टिव्हिटी, वीज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावांपर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली श्वापदांचा धोका पत्करून, वेळ व पैसा खर्च करून कधी पायी, कधी सायकलने, कधी खासगी वाहनांनी ५ ते १० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानगी मिळत नाही. ही किचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पहाड, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल भाग येथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यांवर एसटीही रस्त्यांवर धावू शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते, पूल, सुरक्षित वळणे असणे आवश्यक आहे. एसटीद्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावांपर्यंत जाण्यासाठी रस्तेच नसून तेथे लहान वाहन कसेतरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले.

दळणवळणाच्या सुविधांअभावी मेळाघाटातील अनेक गावात ना एसटी बस, ना मोबाइल कनेक्टिव्हिटी, ना वीज अशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत. तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु, मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोहोचू शकत नाही. तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात.

अडचणीमुळे कामे शक्य नाही

मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्यांचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरुम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्याअभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही.

सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते, वळण चांगले नसल्याचे आढळले. तेथून चारचाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच आत अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहेत तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही.- प्रवीण काळमेघ, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ अमरावती

टॅग्स :Melghatमेळघाटstate transportएसटीAmravatiअमरावती