शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

मेळघाटातील ११० दुर्गम गावांमध्ये एकदाही लालपरीची घंटी वाजली नाही!

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2024 22:38 IST

रस्ते, दळणवळणाच्या सुविधांपासून दूरच

जितेंद्र दखने, अमरावती: देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेळघाटवासीयांनी जिल्ह्यात सर्वाधिक ७९.५५ टक्के मतदान केले. येथील विकासाच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. मात्र, मेळघाटवासीयांच्या नशिबी व्याघ्र प्रकल्पासह कठोर वन कायद्यांमुळे अनेक सुविधांचा लाभ नाही. मजबूत रस्ते, नेट कनेक्टिव्हिटी, वीज नसल्याने मेळघाटातील ११० दुर्गम गावांपर्यंत अद्यापही एसटी बसचे दर्शन घडले नाही. परिणामी येथील आदिवासींना जंगली श्वापदांचा धोका पत्करून, वेळ व पैसा खर्च करून कधी पायी, कधी सायकलने, कधी खासगी वाहनांनी ५ ते १० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकांपर्यंत प्रवास करावा लागत आहे. दुर्गम भागात रस्ते तयार करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण, हा भाग व्याघ्र प्रकल्पात येतो.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका असल्यामुळे रस्ते कामासाठी परवानगी मिळत नाही. ही किचकट व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. पहाड, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, जंगल भाग येथे असल्यामुळे मजबूत रस्ते नसतील, तर धोकादायक रस्त्यांवर एसटीही रस्त्यांवर धावू शकत नाही. यासाठी किमान चांगले रस्ते, पूल, सुरक्षित वळणे असणे आवश्यक आहे. एसटीद्वारे अंतर्गत भागात सर्वेक्षण केल्यानंतर १०० पेक्षा अधिक दुर्गम गावांपर्यंत जाण्यासाठी रस्तेच नसून तेथे लहान वाहन कसेतरी पोहोचू शकते, अशी स्थिती असल्याचे एसटी निरीक्षकांना आढळले. त्यामुळे या गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू करता आली नसल्याचे एसटी विभाग नियंत्रक कार्यालयाद्वारे सांगण्यात आले.

दळणवळणाच्या सुविधांअभावी मेळाघाटातील अनेक गावात ना एसटी बस, ना मोबाइल कनेक्टिव्हिटी, ना वीज अशी येथील दुर्गम भागातील गावांची स्थिती आहे. मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यापर्यंत एसटीची सेवा आहे. या मार्गावर जी गावे आहेत. तिथवर एसटीची सेवा आहे. परंतु, मुख्य रस्त्यापासून तीन ते पाच किलोमीटर आत तसेच १० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांपर्यंत रस्तेच नसल्याने तेथे एसटी पोहोचू शकत नाही. तेथील नागरिक सायकल किंवा इतर वाहनांनी बस थांब्यापर्यंत येतात.

अडचणीमुळे कामे शक्य नाही

मेळघाटात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा हवा तसा फायदा नाही. कारण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह वन कायद्यामुळे येथील रस्त्यांचे स्वरूप बदलणे शक्य नाही. त्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे हात बांधले आहेत. येथील रस्ते आधीपासूनच माती, मुरुम, खडीचे असतील तर ते बदलता येत नाहीत. त्यामुळे खरी अडचण असून रस्त्याअभावी एसटी दुर्गम भागात पोहोचत नाही.

सर्वेक्षण केल्यानंतर मेळघाटातील अंतर्गत भागात रस्ते, वळण चांगले नसल्याचे आढळले. तेथून चारचाकी व्यवस्थित जात नाही. गावे फारच आत अशा रस्त्याने एसटीची वाहतूक करणे शक्य नाही. काही आहेत तिथपर्यंत एसटी घेऊन जाणे कठीण असल्यामुळे तेथे एसटी बस जात नाही.- प्रवीण काळमेघ, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ अमरावती

टॅग्स :Melghatमेळघाटstate transportएसटीAmravatiअमरावती