'मिनरल वॉटर'च्या नावावर अशुद्ध पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 13, 2015 00:32 IST2015-05-13T00:32:48+5:302015-05-13T00:32:48+5:30
विदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो.

'मिनरल वॉटर'च्या नावावर अशुद्ध पाणीपुरवठा
सचिन सुंदरकर अमरावती
विदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो. हेच भावनिक औचित्य साधून मिनरल वॉटरच्या नावावर अशुध्द पाणी पुरविण्याचा गोरखधंदा जोरात आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायावर कुणाचाच अंकुश नाही, हे बोचरे वास्तव आहे.
लग्न अथवा इतर प्रसंगात थंड पाण्याच्या कॅन दिसतात. थंड पाणी पाहून पाहुण्यांनाही समाधान वाटते. थंड केलेले शुध्द पाणी देणे आज एक प्रतिष्ठेचाही भाग झाला आहे. बाजारात असणारी भयंकर स्पर्धा व जास्त नफा मिळविण्याची वृत्ती यामुळे मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. साधारणे ३० रुपयांत २० लिटर अशुध्द, दूषित पाण्याची कॅन मिळत आहे. या कॅनमध्ये रिव्हर्स आॅसमॉसिस (आरओ) ही शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले शुध्द पाणी असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी (युव्ही) हे पाणी अगदी कमी खर्चात फिल्टर केले जाते. पाणी निर्जंतूक व्हायचे असेल तर ते रिव्हर्स आॅसमॉसिस व अल्ट्राव्हॉयलेट प्रक्रियेतून जाययलाच हवे. पिण्यायोग्य पाण्यात क्षाराचे अर्थात टीडीएसचे प्रमाण ७० ते ८० पेक्षा जास्त नको. त्यापेक्षा जास्त टीडीएस असल्यास आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. विक्री होणाऱ्या पाण्यात टीडीएसदेखील जादा असते.
व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी आरओ प्रक्रिया न करताच थंड पाणी विकले जाते. पाणी थंड असल्यास ग्राहकाला त्यातील टीडीएसची फारशी कल्पना येत नाही. थंड पाण्यामुळे पाण्याच्या चवीकडे दुर्लक्ष होते. लग्नसमारंंभात मिळणारे बहुतांश ठिकाणचे पाणी अशुद्ध असते. शुल्क मात्र शुद्ध पाण्याचे आकारले जाते.
सार्वजनिक कार्यक्रमांत पुरविले जाणारे पाणी स्वच्छ, शुद्ध आहे की की की कसे हे तपासण्याची जबाबदारी कुणाची हा अडचणीचा मुद्दा उपस्तिि होतो. सबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाची ही जबाबदारी आहे.