काँग्रेस पक्षाचे देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

By Admin | Updated: December 29, 2016 01:50 IST2016-12-29T01:50:48+5:302016-12-29T01:50:48+5:30

देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे

Important contribution of Congress party to countrywide | काँग्रेस पक्षाचे देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

काँग्रेस पक्षाचे देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

स्थापना दिवस : बबलू देशमुख यांचे प्रतिपादन
अमरावती : देशाच्या हितासाठी भारतीय राष्ट्रीय काँॅग्रेसची नेहमीच महत्वपूर्व भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. ते बुधवारी काँॅग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात १८८५ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून काँग्रेस पक्षाने देशहिताचे महत्वपूर्ण कामगिरी राहीली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉग्रेस पक्षाने देशात विकासगंगा आणून भारत देश सुजलाम, सुफलाम घडविला असे देशमुख म्हणाले. यावेळी काँॅग्रेस पक्षाच्या १३१ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंतराव शेरेकर, प्रकाश काळबांडे, विद्या देडू, श्रीराम नेहर, भैय्या मेटकर, उपाध्यक्ष किशोर बोरकर, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, संजय वानखडे, छाया दंडाळे, उषा उताणे, बापुराव गायकवाड, बाबाराव कडू, सतिश धोंडे, बच्चू बोबडे, विठ्ठल सरडे, बबलू बोबडे, अक्षय भुयार, बाळासाहेब काळबांडे हेमंत येवले, कमलेश तायडे, सुभाष पाथरे, दिलीप तायडे, समाधान दहातोंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश काळबांडे यांनी तर आभार प्रदर्शन संजय मापले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Important contribution of Congress party to countrywide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.