शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

अवैध वाळू उपसा सुरूच, नदीपात्रालगतची शेती धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

अमरावती : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वाळू घाटातून अवैधरीत्या चोरट्या मार्गाने वाळू उपसा केला जात आहे. परिणामी नदीपात्रालगतच्या शेत ...

अमरावती : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वाळू घाटातून अवैधरीत्या चोरट्या मार्गाने वाळू उपसा केला जात आहे. परिणामी नदीपात्रालगतच्या शेत जमीनीला धोका निर्माण झाला आहे. बेसुमार उपशामुळे पर्यावरणाची होत असलेली हानी ही कधीही भरून न निघणारी आहे. एक ते दीड वर्षापासून जिल्ह्यातील वाळूघाटांचे पर्यावरण मूल्यांकन करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणाऱ्यांना सध्या मोकळीक मिळाली असून, राजरोस वाळूची चोरी होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २१६ रेतीघाट उपशाकरिता प्रस्तावित केले होते. त्यापैकी १०७ घाटांना मंजुरी देण्यात आली आहे. १०९ घाटांची परवानगी नाकारली आहे. या १०७ पैकी ९६ रेतीघाटांच्या लिलावाकरिता खनिकर्म संचालनालयाने मान्यता दिली. त्यापैकी केवळ १७ रेतीघाटांचाच पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष लिलाव होणार आहे. त्यापोटी ५ कोटी ९ लाख रुपये उत्पन्न शासनाला मिळेल. पर्यावरण विभागामुळे रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया वर्षभरातपासून थांबली आहे. गतवर्षी ६० रेतीघाटांपैकी २० रेतीघाटांवर उपशाकरिता परवानगी मिळाली होती. १८ घाट घरकुल योजनेसाठी, तर एक घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आला होता. लिलावातून ५ कोटी ९ लाख रुपयांचा महसुल मिळाला होता. मात्र, यंदा जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी झालेले नाहीत. त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळूचा बेसुमार उपास करून नदीकाठालगतच्या शेतजमिनीची सुपीकातही धोक्यात येत आहे. यंदा काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा होत आहे. १ कोटी ८८ लाख ७२ हजार रुपयांची रेती चोरीला गेली. याबाबत रेती तस्करांना दंड आकारण्यात आला आहे. नदीपात्रातून वाळू उपसा करताना जास्तीत जास्त तीन मीटर खोलीची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा चोरट्या वाळू वाहतूक व्यवसायात पाळली जात नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरड कोसळणे. जमीन खरडणे, खचणे, शेतजमीन वाहून गेल्यासंबंधी जिल्ह्यात ७३६.४६ क्षेत्रात नुकसानाची नोंद झाली आहे. १४ पैकी सर्वाधिक नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६२५.२८ हेक्टर क्षेत्राचे, तर वरूड तालुक्यात ८२.३५ हेक्टर क्षेत्रांचे नुकसान आहे. वाळूच्या वाढत्या उपशामुळे शेतीचे नुकसान दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे.

बॉक्स

शेतीलगत उपसा वाढल्याने सुपिकतेचा प्रश्न ऐरणीवर

जिल्हाभरात नदीपात्रानजीकच्या वाळू घाटातील शेतीलगत बेसुमार उपसा केला जात आहे. परिणामी नदीला आलेल्या पुरामुळे गत वर्षभरात ७३६.४६ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यासोबतच जमीन सुपिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बॉक्स

अशा आहेत. अटी व शर्ती

वाळू उत्खननाचे क्षेत्र हे पाच हेक्टरपेक्षा कमी असायला हवे. दोन वाळूघाटातील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक असावे, वाळू घाटावर दोन मीटरपेक्षा अधिक रेती असायला हवी, या अटींच्या आधारे पर्यावरण समिती ही वाळूघाटांना मंजुरी देत असते. जिल्हा प्रशासनाने मंजुरी मिळवण्यासाठी वाळूघाटांचे नकाशे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे. आता ९६ वाळू घाटांपैकी किती घाटांना पर्यावरण विभागाची मंजुरी मिळते, त्यावर वाळू घाटासंदर्भातील प्रक्रिया अवलंबून आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय वाळूघाटांची संख्या

अमरावती ६, भातकुली ४, अंजनगाव सुर्जी २, धामणगाव रेल्वे २, वरूड १, धारणी ६, अचलपूर ९, चांदूर बाजार १५, दर्यापूर ३८, नांदगाव खंडेश्र्वर २, तिवसा ३, चांदूर रेल्वे ४ आणि मोशी ३ याप्रमाणे वाळूघाट आहेत.

कोट

वाळूघाटातील अतिरिक्त उपशामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतो. नदीपात्रातील वाळू गेल्यामुळे शेतातील माती वाहून जाते. परिणामी शेतीची सुपीकता नष्ट होते. रेती ही पाणी शुध्दीकरणाचे काम करते. परंतु अति उपशाने पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे नदीही प्रदूर्षित होते.

- जयंत वडतकर,

पर्यावरणतज्ज्ञ