शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्हा परिषदेची उदासीनता, 6500 संगणक परिचालक वेतनाच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 19:27 IST

राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात 27 हजार प्रसंगणक परिचालकांची 10,313 रुपये वेतनावर नियुक्ती झाली. संगणक परिचालकांचे वेतन जिल्हा परिषदेच्या आपले सरकार पोर्टलच्या खात्यात जमा होते.

मोहन राऊत

अमरावती : महाराष्ट्र राज्यात शासनाच्या सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहचाव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. त्यातील राज्यातील 6500 परिचालकांचे वेतन रखडले असून, काही रुजू होण्यासाठी प्रतिक्षा करीत आहेत. 

राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात 27 हजार प्रसंगणक परिचालकांची 10,313 रुपये वेतनावर नियुक्ती झाली. संगणक परिचालकांचे वेतन जिल्हा परिषदेच्या आपले सरकार पोर्टलच्या खात्यात जमा होते. त्यानंतर हे काम सी.एस.सी. एस.पी.व्ही.कंपनीला दिल्यामुळे ही रक्कम कंपनीला वळते केले जाते. त्यांच्या नावे निघालेल्या 12,331 रुपयांच्या परिपत्रकावर स्वाक्षरीही घेतली जाते. परंतु प्रत्यक्षात 4500 ते 5 हजार रुपयेच देण्यात येते. त्यात जिल्ह्यातील 116 परिचालकांचे वेतन जुलै 2017 पासून रखडले आहे. त्यामुळे या नवीन प्रकल्पमध्ये भ्रष्टाचार नांदत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कंपनीच्या घशात दर महिन्याला कोट्यवधी रुपयेग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोगामधून प्रती आपले सरकार सेवा केंद्र प्रमाणे 12,331 रु.प्रती महिनाप्रमाणे कंपनीला एका ग्रामपंचायतीकडून वर्षाला 1,47,962 रुपये दिले जाते. राज्यभरात ही रक्कम करोडोच्या घरात आहे. केंद्र चालकाला प्रती महिना 6000 रुपये मानधन दिले जाते. वरील रक्कम स्टेशनरी पुरविण्याच्या नावाखाली ग्रा.पं.मार्फत वसूल केली जाते. परंतु, कोणत्याच प्रकारची स्टेशनरी कंपनीमार्फत पुरविली जात नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला एका आपले सरकार सेवा केंद्र मागे 6 ते 7 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कंपनी आपल्या घशात घालत आहे. राज्याचा विचार केल्यास हा आकडा कोटींच्या घरात जातो.

वषार्तून दोनदाच केवळ मानधन जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सर्व महिन्यांची रक्कम 3 महिन्यांपूर्वी कंपनीला देऊनही आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे मानधन दर सहा महिन्यांनी असे  वर्षातून दोनदाच होते. जिल्हा परिषदअमरावती येथील संबंधित विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे यावर्षी जानेवारी 2017 पासूनचे मानधन अद्याप मिळालेले नाहीत.   

112 संगणक परिचालंकावर अन्याय संग्राम प्रकल्प बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक बेरोजगार झाले. नंतर आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात केंद्रांची कपात झाल्यामुळे जिल्ह्यात 112 संगणक परिचालक अजूनही बेरोजगार आहेत. याकरिता जिल्हा परिषदेवर संगणक परिचालकांनी मोर्चा नेला होता. त्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संग्राम प्रकल्पातील बेरोजगार मुलांना नियमानुकूल सुरू असलेल्या प्रकल्पात सामावून घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, जिल्ह्यातील कंपनी मुलांना कामावर घेण्यास टाळाटाळ करीत आहे.

आमच्यावरील अन्याय थांबवावा. अन्यथा जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करून सामूहिक राजीनामे देऊ. सिद्धार्थ रमेश मनोहरे,जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद