शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

By उज्वल भालेकर | Updated: November 13, 2023 20:05 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली. 

अमरावती: राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले असून खर्च वाढला आहे. परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी मोर्चा काढून सरकारला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली. 

आमदार रोहित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी ते अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले जो पवार साहेबांचा दाखला सोशल मीडियावर बाहेर फिरत आहे तो खरा नाही. भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरवून त्याचे राजकारण करते. त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढाच काय ते समजते. आणि सत्तेत आल्यावर सत्तेचा दुरुपयोग करणे एवढंच भाजपला माहीत आहे. सामान्य लोकांचे प्रश्नांची मात्र त्यांना काहीही घेण देण नाही.लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो. मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू, मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाईल असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, मात्र अजित दादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहे असं जाणवत असून भाजपला लोकनेता पटत नाही असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी