शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:58 IST

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय

अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन चांगलाच गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालिसा हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. आता, त्यावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. यावेळी, हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनाही त्यांनी निशाणा बनवलं. ''सरकारला प्रश्न विचारले की आवडत नाही. सध्या कसं झालंय, मुस्लिमाने विरोधात बोललं की त्याला दहशतवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललं की त्याला नक्षलवादी ठरवायचं आणि इतरांनी विरोधात बोललं की त्याला देशद्रोही ठरवायंचं असं काम सुरू आहे. पण, आपण कधी प्रश्न विचारतोय का?'' असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभा सभागृहात हनुमान चालिसा म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले?. हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. जर, हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ जीव परत येणार असतील, तर निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेंच्या हनुमान चालिसेच्या समर्थनार्थ आहोत, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये जे घडलं ते रिव्हर्स करुन ओक्के आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालिसेचं स्वागत करू. पण, कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेताय? असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी अमरावतीमधील सभेत विचारला. 

जिथे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्नच मांडले जात नाहीत. त्यामुळे, या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्नच अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसांत २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाहीत, असेही अंधारे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा