शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:58 IST

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय

अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन चांगलाच गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालिसा हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. आता, त्यावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. यावेळी, हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनाही त्यांनी निशाणा बनवलं. ''सरकारला प्रश्न विचारले की आवडत नाही. सध्या कसं झालंय, मुस्लिमाने विरोधात बोललं की त्याला दहशतवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललं की त्याला नक्षलवादी ठरवायचं आणि इतरांनी विरोधात बोललं की त्याला देशद्रोही ठरवायंचं असं काम सुरू आहे. पण, आपण कधी प्रश्न विचारतोय का?'' असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभा सभागृहात हनुमान चालिसा म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले?. हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. जर, हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ जीव परत येणार असतील, तर निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेंच्या हनुमान चालिसेच्या समर्थनार्थ आहोत, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये जे घडलं ते रिव्हर्स करुन ओक्के आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालिसेचं स्वागत करू. पण, कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेताय? असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी अमरावतीमधील सभेत विचारला. 

जिथे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्नच मांडले जात नाहीत. त्यामुळे, या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्नच अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसांत २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाहीत, असेही अंधारे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा