शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:58 IST

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय

अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन चांगलाच गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालिसा हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. आता, त्यावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. यावेळी, हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनाही त्यांनी निशाणा बनवलं. ''सरकारला प्रश्न विचारले की आवडत नाही. सध्या कसं झालंय, मुस्लिमाने विरोधात बोललं की त्याला दहशतवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललं की त्याला नक्षलवादी ठरवायचं आणि इतरांनी विरोधात बोललं की त्याला देशद्रोही ठरवायंचं असं काम सुरू आहे. पण, आपण कधी प्रश्न विचारतोय का?'' असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 

खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभा सभागृहात हनुमान चालिसा म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले?. हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. जर, हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ जीव परत येणार असतील, तर निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेंच्या हनुमान चालिसेच्या समर्थनार्थ आहोत, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये जे घडलं ते रिव्हर्स करुन ओक्के आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालिसेचं स्वागत करू. पण, कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेताय? असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी अमरावतीमधील सभेत विचारला. 

जिथे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्नच मांडले जात नाहीत. त्यामुळे, या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्नच अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसांत २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाहीत, असेही अंधारे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा