शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:16 IST

सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या काळात रोज तीन शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याने आता वरवरची मलमपट्टी नव्हे, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. विदर्भात अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा हे सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणा-या शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व त्याच्यावरील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१७ पावेतो १४ हजार ६७७ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ६ हजार ५५९  प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ७ हजार ९९६ अपात्र, तर १२२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदाच्या वर्षात १,१५३ शेतक-यांच्या आत्महत्या  झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारी १०७, मार्च ११२, एप्रिल ८३, मे ९६, जून ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८ व २७ डिसेंबरपर्यंत ६५ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.बुलडाणा आघाडीवर २०१७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या जिल्ह्यात यंदा ३०५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले; अमरावती २६१, यवतमाळ २३७, अकोला १६५, वाशिम ७२ व वर्धा जिल्ह्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली.  कर्जमाफीच्या २०० दिवसांत ६६० शेतकरी आत्महत्याशेतक-यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी शासनाने जून महिन्यात कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यामध्येही शेतकºयांना दिलासा मिळाला नसल्याची बाब आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या २०० दिवसांच्या कालावधीत ६६० शेतकºयांनी मृत्यूचा फास ओढला. यामध्येही खरिपाच्या पेरणीपश्चात आॅगस्ट महिन्यात ११९, तर सप्टेंबर महिन्यात १२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी