शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
5
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
6
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
7
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
8
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
9
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
10
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
11
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   
12
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
13
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
14
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
16
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
17
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
18
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
19
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
20
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."

सरत्या वर्षात व-हाडात शेतकरी आत्महत्यांची हजारी पार; १,१५३ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:16 IST

सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या काळात रोज तीन शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याने आता वरवरची मलमपट्टी नव्हे, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. विदर्भात अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा हे सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणा-या शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व त्याच्यावरील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१७ पावेतो १४ हजार ६७७ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये ६ हजार ५५९  प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ७ हजार ९९६ अपात्र, तर १२२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदाच्या वर्षात १,१५३ शेतक-यांच्या आत्महत्या  झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारी १०७, मार्च ११२, एप्रिल ८३, मे ९६, जून ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८ व २७ डिसेंबरपर्यंत ६५ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.बुलडाणा आघाडीवर २०१७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या जिल्ह्यात यंदा ३०५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले; अमरावती २६१, यवतमाळ २३७, अकोला १६५, वाशिम ७२ व वर्धा जिल्ह्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली.  कर्जमाफीच्या २०० दिवसांत ६६० शेतकरी आत्महत्याशेतक-यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी शासनाने जून महिन्यात कर्जमाफी जाहीर केली. मात्र, यामध्येही शेतकºयांना दिलासा मिळाला नसल्याची बाब आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या २०० दिवसांच्या कालावधीत ६६० शेतकºयांनी मृत्यूचा फास ओढला. यामध्येही खरिपाच्या पेरणीपश्चात आॅगस्ट महिन्यात ११९, तर सप्टेंबर महिन्यात १२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी