शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मानवी श्रृखंला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST

अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात देशातील शेतकरी उतरला आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ अखिल ...

अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात देशातील शेतकरी उतरला आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ अखिल भारतीय संघर्ष समन्वय समिती व अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील इर्वीन चौकात मानवी श्रृंखला आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरीविरोधी तीनही कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावे, शेतकरी विरोधी वीजबील विधेयक पुढे रेटण्याचे कटकारस्थान बंद करावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभावाचे संरक्षण द्या आदी प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनावरील दडपशाहीचा निषेध यावेळी करण्यात आला. आंदोलनाचे अखिल भारतीय किसान संघाचे समन्वय समिती व जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलच्यावतीने ही मानवी साखळी निर्माण करून जाहीर समर्थन देण्यात आले आहे. या आंदोलनात समन्वयक अशोक सोनारकर, सुभाष पांडे, डी.एस पवार, जे.एम. कोठारी, लक्ष्मण धाकडे, राजेंद्र भांबोरे, बाळासाहेब कुटेमाटे, सुनील घटाळे, नीळकंठ ढोके, चंद्रकांत बानुबाकोडे, नंदू नेतनराव आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.