शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत? तलाठ्यांच्या याद्या 'कृषी'ला अप्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:06 IST

भावांतर योजना : कपाशी, सोयाबीनचे अनुदान केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनसाठी दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे या यादीत नसल्याने त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी ज्यांच्या सात-बाऱ्यावर या पिकांची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या तलाठीवर्गाकडून मागविण्यात आल्या. प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्यापासून या याद्या तलाठी वर्गाकडून कृषी विभागाला अप्राप्त असल्याने शासनाला प्रस्ताव गेला नसल्याचे वास्तव आहे.

गतवर्षी पावसाअभावी कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले व हमीभावही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही निघालेला नाही. त्यामुळे या खातेदारांना दोन हेक्टर मर्यादेत प्रतिहेक्टरी पाच हजारांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये ज्या खातेदारांनी ई पीक पाहणी केली असेल त्यांनाच मदत देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले व त्याच शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पेऱ्यानुसार शासन मदत मिळण्याची शक्यता आहे. 

वनपट्टेधारकांची यादी जिल्हाधिकारी देणार आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित आहे. अशा वनपट्टेधारकांपैकी कपाशी किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती. याची गावनिहाय यादी संकलित करण्यात येऊन जिल्हा स्तरावरून ही यादी कृषी विभागाला देण्यात येणार आहे व याची पोर्टलवर माहिती कृषी विभागाद्वारा अपलोड करण्यात येणार असली तरी माहिती अद्याप अप्राप्त आहे.

तलाठ्यांच्या याद्या कृषी विभागाला अप्राप्त ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली व त्यांची नावे यादीत नाहीत. मात्र, त्यांच्या सात-बारावर पिकांची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना याबाबत स्थानिक तलाठी यांच्याकडे नोंद करावी लागेल व त्यानंतर पडताळणी करून संबंधित तलाठी यांच्याद्वारा याद्या कृषी विभागाला देण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात अशा याद्या कृषी विभागाकडे अप्राप्त आहेत.

योजनेची जिल्हा स्थिती ई-केवायसी झालेले शेतकरी  - २,१७,८१५             कपाशीचा पेरा असलेले शेतकरी - १,०६,३०२ सोयाबीनचा पेरा शेतकरी - १,४८,४७७

"यादीत नाव असलेल्या व ई-केवायसीची प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळाला. सात-बाऱ्यावर नोंद व ई-पीक पाहणीमध्ये नोंद नाही. अशा शेतकऱ्यांच्या याद्या अप्राप्त आहेत." - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती