शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

१० लाख पशुधन जगविणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:24 AM

जिल्ह्यातील १० लाख ३ हजार ५५५ पशुधनाला मे महिन्यात १ लाख १ हजार २४२ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मात्र, उपलब्ध असलेले वैरण या महिन्याअखेरीस संपुष्टात येणार असल्याने पेरणीच्या तोंडावर शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे चाराही नाही, पाणीही नाही अन् छावणीही नाही; अशी जिल्हास्थिती आहे.

ठळक मुद्देचारा, पाणी अन् छावणीही नाही : ढवळ्या-पवळ्यासह कपिला कत्तलखान्यात!, शेतकरी चिंतेत

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १० लाख ३ हजार ५५५ पशुधनाला मे महिन्यात १ लाख १ हजार २४२ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मात्र, उपलब्ध असलेले वैरण या महिन्याअखेरीस संपुष्टात येणार असल्याने पेरणीच्या तोंडावर शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे चाराही नाही, पाणीही नाही अन् छावणीही नाही; अशी जिल्हास्थिती आहे. त्यामुळे ढवळ्या- पवळ्यासह कपिला कत्तलखाण्यात जाणार काय, या चिंतेने पशुपालक अस्वस्थ झाला आहे.सलग चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने पाणी अन् वैरणटंचाई आहे. डिसेंबरपासून ८० लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. मध्यम व मुख्य प्रकल्पातदेखील जलसाठ्यापेक्षा मृत साठा अधिक आहे. त्यामुळे वैरणटंचाईसोबत पाणीटंचाईचाही सामना पशुपालकांना करावा लागत आहे. प्रशासनाचे धोरण कागदोपत्रीच सक्षम आहे.जिल्ह्यासारखीच परिस्थिती मराठवाड्याची असताना त्या ठिकाणी हजारो चारा छावण्या सुरू झाल्यात. जिल्ह्यात मात्र ठणठणाट आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधीदेखील याविषयी गंभीर नसल्यामुळे पेरणीच्या काळात हजारो जनावरे कत्तलखान्यात जाण्याचे चित्र आगामी काळात निर्माण तर होणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात एकोणविसाव्या पशुगणनेनुसार १० लाख पशुधन आहे. यामध्ये किमान एक लाख जनावरे ही निरुपयोगी आहे. मात्र, त्यांनादेखील जगण्यासाठी दिवसाला किमान सहा किलो वैरण लागते. त्यांच्यासाठीदेखील सुका चारा उपलब्ध नाही. दावणीला चारा अन् अन् पाणी नाही. गोहत्याबंदीमुळे ही जनावरे विकलीदेखील जात नाहीत. केवळ दुधाळ जनावरांसाठी शासनाच्या विविध योजना आहे. त्यामुळे भाकड जनावरांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पांजरपोळ संस्थेला शासनाचे अनुदान नाही. जिल्ह्यात चारा छावणी नसल्यामुळे किमान अशा सेवाभावी संस्थांना शासनाने अनुदान देऊन भाकड जनावरे जगू देण्यासाठी बळ द्यावे, अशी मागणी या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.गत हंगामातील चारा आठ महिने पुरविलागतवर्षी पिकांच्या दुय्यम उत्पादनातून सर्वाधिक ६,५८,२४५ मे.टन चारा उपलब्ध झाला. जिल्हा वार्षिक योजनेतून वैरण विकास कार्यक्रमातंर्गत ८१ लाखांच्या निधीतून १,५९,९५६ मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला. कामधेनू दत्तक योजनेसाठी ३.२३ लाख निधीतून १७५५ मेट्रिक टन, एनडीडीबी योजनेतंर्गत २४ लाखांच्या निधीतून १,११९ मेट्रिक टन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ९.७५ लाखांच्या निधीतून ५,६६२ मेट्रिक टन असा एकूण १.१७ कोटींच्या निधीतून ८,२६,७२७ मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला. जिल्हात दरमहा १,०५,२४२ मेट्रिक टन चारा लागतो. त्यानुसार हा चारा आठ महिने पुरेल एवढाच होता.वैरण विकास खुंटलाशासनाकडे प्रस्ताववैरण विकास, गाळपेर व अन्य कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना वैरण बियाणे उपलब्ध करण्यात आले. मात्र, डिसेंबर व जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने पुरेसा वैरण विकास झालाच नाही. त्यामुळे आगामी काळात वैरण टंचाई लक्षात घेता, जिल्ह्यात चाºयाची उपलब्धता व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, यावर शासनाद्वारे अद्याप तोडगा निघालेला नाही. आणखी उशीर झाल्यास जिल्ह्याचे चित्र गंभीर होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई