शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

By admin | Published: August 31, 2016 12:08 AM

शहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो.

गोविंद गुरुकुल आश्रम शाळाप्रकरण : समाजकल्याण अधिकारी झोपेतसुमित हरकुट चांदूरबाजारशहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो. २४ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजतादरम्यान तो वसतिगृहात वरच्या मजल्यावरून खाली कोसळला. मात्र ही दुर्घटना घडली त्याच दिवशी वसतिगृहाच्या हजेरी पुस्तिकेत भावेश गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. तो गैरहजर असताना वसतिगृहाच्या आवारात ही दुर्घटना घडली कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. भावेश हा विद्यार्थी खाटीक समाजाचा रिद्धपूर याच गावातील रहिवासी असून त्याला वसतिगृहातील निवासी विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. वसतिगृहाच्या हजेरी पुस्तकानुसार त्याचा अनुक्रमांक वर्ग तिसरीमधील ५० वर त्याच्या नावाची नोंदही आहे. नियमानुसार स्थानिक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. विशेष बाब अशी की, वसतिगृहाच्या हजेरी पटावर मागील संपूर्ण दिवस वसतिगृहात उपस्थित असणाऱ्या भावेशला घटनेच्या दिवशी शाळेत हजर असतानाही वसतिगृहामध्ये गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. २४ आॅगस्टला उपस्थितीच्या रकाण्यात त्याच्या नावापुढे कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. असे का करण्यात आले, याचे उत्तर शाळा प्रशासन देऊ शकले नाही. या घटनेनंतर संबंधित वसतिगृहाचा हजेरी पटाचे २६ आॅगस्टच्या सायंकाळी अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांच्या वसतिगृहातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या नव्हत्या. या नोंदी का घेण्यात आल्या नाहीत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या वसतिगृहात एकूण १२० विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण महिनाभर १२० विद्यार्थी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी ३० विद्यार्थी अनुपस्थित दाखविण्यात आले. परंतु सलग तीनदिवस वसतिगृहाची पाहणी केली असता प्रत्यक्ष ५० ते ५५ विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले आहेत.याविषयी संबंधितांकडून माहिती घेतली असता विद्यार्थी राखी पौर्णिमेनिमित्त गावाला गेली असल्याचे सांगण्यात आले. सलग आठ दिवस विद्यार्थी गैरहजर असतानासुद्धा हजेरीपटावर १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे. मग घटनेच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गैरहजर कसे? ही किमया शाळेच्या कर्तबगार मुख्याध्यापकांनी केली असावी, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविली जात आहे.समाजकल्याण अधिकारी केव्हा देणार भेट ?या आश्रमशाळेत इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची घटना माहिती असूनही वसतिगृहाला साधी भेटही दिली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर २६ आॅगस्ट रोजी येणारे समाजकल्याण अधिकारी आजवर वसतिगृहापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यामागील खरे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांची पडताळणी आवश्यकगोविंद गुरुकुल आश्रमशाळेतील १२० निवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जातीनिहाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरून चौकशी होणे गरजेचे आहे. या वसतिगृहाला व्हीजेएनटीची मान्यता प्राप्त असताना या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात आला आहे काय, याची प्रामाणिक चौकशी झाल्यास या आश्रमशाळेतील प्रवेश व देण्यात येणाऱ्या सुविधा उघडकीस येईल, हे मात्र निश्चित.