शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना ...

दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल

अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना परीक्षा, ना शाळा’ थेट निकालाने अनेक गुणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांमुळे ‘ढ’ विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांपेक्षा निकालात पुढे आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या अनेक विद्यार्थिंनी माझ्यापेक्षा माझा मित्र, मैत्रिणीला जास्त गुण कसे, असा प्रश्न बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारत निकालावर बोटला आहे.

जिल्ह्यात दहावी, बारावीचा निकाल जंबो लागला आहे. काही शाळांनी १०० टक्के निकाल लागल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या विद्यार्थांनी नववीपर्यंत नियमित वर्ग केले नाही, तेसुद्धा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने हुशार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक हैराण झाले आहेत. दहावी, बारावीचे गुणी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी निकालावरून त्यांच्या मनात संशयकल्लोळ कायम आहे.

----------------------------

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

यंदा मुलगी दहावीत होती. ऑनलाईन शिक्षण घेताना खासगी शिकवणीतून परीक्षांना सामोरे जाण्याची चांगली तयारी होती. मात्र, परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाने निकाल जाहीर झाला. नक्कीच मुलीचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

- जयश्री लांडे, पालक

---------------

यंदा बारावीची परीक्षा होईल, असे वातावरण होते. मात्र, शासनाने परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर केला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नाही, तेदेखील पास झाले. शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- मीनाक्षी करवाडे, पालक

------------

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

- यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर झाला. त्यामुळे गुणी विद्यार्थ्यांना माेठा फटका बसला आहे. पुनर्मूल्यांकनाची संधीदेखील नाही.

- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिलेले गुण आणि त्यानंतर बोर्डाचा निकाल हाच प्रमाण ठरला आहे.

- अनेक विद्यार्थी अभ्यास न करता उत्तीर्ण झाले. किंबहुना हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुणदेखील मिळविण्यात आघाडी घेतली आहे.

------------------

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?

- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठविलेल्या गुणांच्या आधारे बोर्डाने गुणपत्रिका जारी केल्या आहेत. त्यामुळे कोण विद्यार्थी हुशार, कोण ‘ढ’ कसे ठरविणार.

- दहावी, बारावी काही विद्यार्थांनी वर्षभर पुस्तक देखील उघडून बघितले नाही, तेदेखील चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले, हा संशोधनाचा विषय आहे.

- विद्यार्थ्यांपेक्षा पालकवर्ग निकालावर चिंतातूर आहे. मात्र, शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केले असून, बोर्डाने केवळ निकाल जाहीर केला आहे.

--------------------------------

विद्यार्थी म्हणतात....

परीक्षेची उत्तम तयारी केली होती. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाने घात केला आहे. ७२ टक्के गुणावर समाधान मानावे लागले. परीक्षाविना निकालाने नुकसान झाले आहे.

- चुटकी रोकडे, दहावी उत्तीर्ण विदयार्थिंनी

------------

बारावीनंतर अभियांत्रिकी करिअर करण्याचे स्वप्न होते. परीक्षांना सामोरे जाण्याची जाेरदार तयारी होती. पण, परीक्षा रद्द झाल्यात आणि मन खिन्न झाले. जे विद्यार्थी ४० टक्के गुण मिळवू शकत नव्हते त्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले.

- अमित देशमुख, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी