शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना ...

दहावी, बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सवाल, शंकांचे निरसन करताना बोर्डाचे अधिकारी हतबल

अमरावती : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या ‘ना परीक्षा, ना शाळा’ थेट निकालाने अनेक गुणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांमुळे ‘ढ’ विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांपेक्षा निकालात पुढे आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या अनेक विद्यार्थिंनी माझ्यापेक्षा माझा मित्र, मैत्रिणीला जास्त गुण कसे, असा प्रश्न बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारत निकालावर बोटला आहे.

जिल्ह्यात दहावी, बारावीचा निकाल जंबो लागला आहे. काही शाळांनी १०० टक्के निकाल लागल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या विद्यार्थांनी नववीपर्यंत नियमित वर्ग केले नाही, तेसुद्धा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने हुशार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक हैराण झाले आहेत. दहावी, बारावीचे गुणी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी निकालावरून त्यांच्या मनात संशयकल्लोळ कायम आहे.

----------------------------

निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले...

यंदा मुलगी दहावीत होती. ऑनलाईन शिक्षण घेताना खासगी शिकवणीतून परीक्षांना सामोरे जाण्याची चांगली तयारी होती. मात्र, परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाने निकाल जाहीर झाला. नक्कीच मुलीचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

- जयश्री लांडे, पालक

---------------

यंदा बारावीची परीक्षा होईल, असे वातावरण होते. मात्र, शासनाने परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर केला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नाही, तेदेखील पास झाले. शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- मीनाक्षी करवाडे, पालक

------------

परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही

- यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता थेट निकाल जाहीर झाला. त्यामुळे गुणी विद्यार्थ्यांना माेठा फटका बसला आहे. पुनर्मूल्यांकनाची संधीदेखील नाही.

- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिलेले गुण आणि त्यानंतर बोर्डाचा निकाल हाच प्रमाण ठरला आहे.

- अनेक विद्यार्थी अभ्यास न करता उत्तीर्ण झाले. किंबहुना हुशार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुणदेखील मिळविण्यात आघाडी घेतली आहे.

------------------

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला जास्त गुण कसे?

- शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठविलेल्या गुणांच्या आधारे बोर्डाने गुणपत्रिका जारी केल्या आहेत. त्यामुळे कोण विद्यार्थी हुशार, कोण ‘ढ’ कसे ठरविणार.

- दहावी, बारावी काही विद्यार्थांनी वर्षभर पुस्तक देखील उघडून बघितले नाही, तेदेखील चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले, हा संशोधनाचा विषय आहे.

- विद्यार्थ्यांपेक्षा पालकवर्ग निकालावर चिंतातूर आहे. मात्र, शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केले असून, बोर्डाने केवळ निकाल जाहीर केला आहे.

--------------------------------

विद्यार्थी म्हणतात....

परीक्षेची उत्तम तयारी केली होती. मात्र, अंतर्गत मूल्यमापनाने घात केला आहे. ७२ टक्के गुणावर समाधान मानावे लागले. परीक्षाविना निकालाने नुकसान झाले आहे.

- चुटकी रोकडे, दहावी उत्तीर्ण विदयार्थिंनी

------------

बारावीनंतर अभियांत्रिकी करिअर करण्याचे स्वप्न होते. परीक्षांना सामोरे जाण्याची जाेरदार तयारी होती. पण, परीक्षा रद्द झाल्यात आणि मन खिन्न झाले. जे विद्यार्थी ४० टक्के गुण मिळवू शकत नव्हते त्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले.

- अमित देशमुख, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी