शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:47 PM

आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची.

ठळक मुद्देटेबल एक अन् लाभार्थी शंभर : शासनाच्या बडग्यामुळे असुविधा वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. एकच टेबल असल्यामुळे रांगेत तिष्ठत बसण्यापासून सुटका नाही आणि काही चुकलेच, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हावे लागते. ६५ वर्षांवरील नागरिकांची ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत पास अर्थात स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती आगारात होत असलेली आबाळ दुर्दैवी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी सोमवारी रांगेत लागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली.‘लोकमत’ची चमू सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता आगाराच्या पास वितरण विभागात दाखल झाली, त्यावेळी अमरावतीसह टाकरखेडा संभू, साऊर, रामा, आसरा, भातकुली, देवरा देवरी, पोहरा, जळका शहापूर, माहुली आदी भागातून आलेले सुमारे शंभरावर ज्येष्ठ नागरिक रांगेत लागले होते. एक-एक क्रमांक सरकायला किमान २० मिनिटे ते अर्धा तास लागत असल्याचे पाहून त्यांचे धैर्य सुटले होते. काही जण सकाळी ७ च्या एसटीने आले होते, तर काही जणांनी त्यासाठी अमरावतीत मुक्काम केला होता. दुपारी पाऊण वाजेपर्यंत म्हणजे पाच तासांनंतरही अवघ्या ३० व्यक्तींची कागदपत्रे घेण्यात आले होते. दरम्यान, रमेश अंबुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलचा एसएमएस डेटा डिलीट करण्याच्या सूचना दिल्या. हे काय नवीन, असे वृद्धांना होऊन गेले. अखेरीस पास काढण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली.अशी आहे प्रक्रिया५ मार्च २०१९ पासून स्मार्ट कार्डसाठी कागदपत्रे घेण्यास सुरूवात झाली. शासनाने सांगितलेली आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. याआधारे संगणकात नोंदणी झाल्यानंतर ओटीपी क्रमांक मिळतो. त्या क्रमांकाची नोंद झाली, की प्रक्रिया पूर्ण. त्यानंतर पोस्टाने घरपोच स्मार्ट कार्ड मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.मुदतवाढीचा कुणालाच नाही पत्तामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ जुलै रोजी तातडीचे पत्र काढून ३१ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात मुदतवाढ दिली आहे. तथापि, याबाबत भिंतीवरील पत्रकाशिवाय कुठेच जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याबाबत विविध माध्यमांद्वारे प्रसाराची गरज आहे.नवीन मोबाईलच आणलाआसरा येथील राजाराम डोंगरे हे रविवारी स्मार्ट कार्डसंबंधी दस्तावेज देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाइल कुणाचा, अशी विचारणा झाली, तसेच रांगेत असलेल्याच्या मालकीचा मोबाइल असायला हवा, असे सांगण्यात आले. परिणामी नवाकोरा मोबाइल विकत घेऊन ते सोमवारी रांगेत दाखल झाले.एकच टेबलज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसंबंधी कागदपत्रांसाठी रोज मोठी रांग लागत असून, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी एकच टेबल दिल्याची तक्रार टाकरखेडा मोरे येथील ओंकार मोरे यांनी केली. आसार येथील प्रमोद देशमुख यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, शासनाकडून तसे निर्देश असून, टेबल वाढविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे वाहतूक नियंत्रक जयंत मुळे म्हणाले.दोन स्नॅपनंतर फिरायला लागला पंखामध्यवर्ती बस स्थानकात पास वितरण खिडकीकडून अनेक वर्षांपासून फलक लागलेले असल्याने बाहेरची हवी फार कमी आत येते. उकाड्यामुळे अंग चिकट झालेल्या वयोवृद्धांनी पंखा लावण्यासाठी आधीच विनवणी केली होती. मात्र, ‘लोकमत’च्या कॅमेºयाचे स्नॅप पडण्यापूर्वी त्यांच्या विनंतीला मान मिळाला नाही. दोन स्नॅपनंतर मात्र पंखा फिरायला लागला.आजी-आजोबा त्रस्तबीबीजान (टाकरखेडा संभू), निर्मला चेंडकापुरे, रमाबाई चव्हाण, शे. हसन शे. महबूब (अमरावती), शंकरराव नांदणे, सरूबाई नांदणे (देवरा), यशोदा दहाट, सुमन टवरे, (जळका शहापूर), इंदूबाई सोनटक्के (यावली), श्रीराम गायकवाड, पुनाबाई गायकवाड (साऊर), पंचफुला सोनोने (पोहरा)येथून आलेले बहुतांश ज्येष्ठ नागरिक रांगेत त्रस्त झाले होते.प्रिंटर बंद पडल्याने प्रक्रिया खोळंबली. एरवी पाच-सात मिनिटांत एक अर्ज घेतला जातो. मात्र, काही जण मोबाइलऐवजी चिठ्ठी घेऊन येतात. त्यांचा नंबर कुठून घ्यावा? एक ते दीड सेकंदच ओटीपी अस्तित्वात राहतो. स्मार्ट कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी आहे.- रमेश अंबुलकर,वाहतूक नियंत्रक