शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मात्र, हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांचा रोजगार बुडाला आहे. किंबहुना हॉटेलमधील शिल्लक राहणाऱ्या पोळी-भाकरीने अनेकांच्या पोटाची भूक भागत होती ती देखील हिरावली आहे.

अमरावती शहरात १२५ पेक्षा अधिक हॉटेलची संख्या आहे. एका हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी किमान दोन ते तीन महिला काम करतात. हॉटेलबंदीमुळे ३०० ते ४०० महिलांचा रोजगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनविण्याच्या कामावर गेल्याशिवाय कुटुंबाचा गाडा चालवू शकत नाही, अशा १५० महिलांवर आजारी पतीसह मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात काही महिला घरूनच पोळी-भाकरी, मांडे बनवून हॉटेलमध्ये पुरवितात. गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. कसेबसे नवीन वर्षात हॉटेल सुरू झाले असताना आता पुन्हा ३० ए्प्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले. गरीब, सामान्य कुटुंबीयांनी रोजगार कसा मिळवावा, हा यक्षप्रश्न कष्टकरी महिलांनी उपस्थित केला आहे.

-----------------

शहरात हॉटेल्सची संख्या : १२५

पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची साधारण संख्या : ३५०

--------------

कोट

घरात पती आजारी आहे. मुलगी लग्नाला आली आहे. आज, उद्या कधीतरी हॉटेल नियमित सुरू होतील आणि एकदाचा कायम रोजगार मिळेल, याची प्रतीक्षा आहे. मात्र, कोरोनाने जगणे हिरावले आहे.

- सिंधू वानखडे, अमरावती

---------

कोट

दारूच्या व्यसनाने तीन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. एक मुलगी, एक मुलगा असा सांभाळ करावा लागत आहे. घरी वृद्ध सासू असून, त्यांचे आजारपणाची जबाबदारी आहे. हॉटेलमध्ये भाजी-पोळी बनविण्यातून रोजगार तर मिळतो. पण उरलेल्या पोळी-भाकरीतून कुटुंबांची भूक भागविते

शैला मनवर, बडनेरा

---------------

कोट

दिवसा घर सांभाळून सायंकाळी ५ वाजतानंतर हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी रोजगार मिळतो. मात्र, गत वर्षभरापासून रोजगार हिरावला आहे. महिलांना बाहेरील कामे करताना अनंत अडचणी येतात. हॉटेलमध्ये ठरावीक वेळेत कामे असल्याने ते सोयीचे ठरते. आता रोजगार नसल्याने कुटुंबात आर्थिक परवड होत आहे.

- पुष्पा मेश्राम, अमरावती.

-----------

सांगा! गरीबांनी जगावे नाही का?

कामावर गेल्याशिवाय चुल पेटत नाही. किमान हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याच्या कामातून दिवसाला २५० ते ३०० रूपये रोजगार मिळतो. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून हॉटेल व्यवसायाला अवकळा आली आहे. हॉटेलमधील कूक, वेटर, हेल्पर यासह महिलांचा रोजगार हिरावला आहे. गरीब, श्रमजीवी महिलांसमोर कुटुंबाचा सांभाळ करताना मुलांचे शिक्षण, आरोग्याची दक्षता घ्यावी लागते. ‘काम नाही तर मजुरी नाही’ असा हॉटेल व्यवसायाचे

नियम आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये गरीबांनी जगावे नाही का? असा सवाल हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांनी उपस्थित केला आहे.