शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मात्र, हॉटेलमध्ये पोळ्या-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांचा रोजगार बुडाला आहे. किंबहुना हॉटेलमधील शिल्लक राहणाऱ्या पोळी-भाकरीने अनेकांच्या पोटाची भूक भागत होती ती देखील हिरावली आहे.

अमरावती शहरात १२५ पेक्षा अधिक हॉटेलची संख्या आहे. एका हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी किमान दोन ते तीन महिला काम करतात. हॉटेलबंदीमुळे ३०० ते ४०० महिलांचा रोजगारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनविण्याच्या कामावर गेल्याशिवाय कुटुंबाचा गाडा चालवू शकत नाही, अशा १५० महिलांवर आजारी पतीसह मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी आहे. शहरातील मुस्लिम बहुल भागात काही महिला घरूनच पोळी-भाकरी, मांडे बनवून हॉटेलमध्ये पुरवितात. गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे रोजगार गेला. कसेबसे नवीन वर्षात हॉटेल सुरू झाले असताना आता पुन्हा ३० ए्प्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले. गरीब, सामान्य कुटुंबीयांनी रोजगार कसा मिळवावा, हा यक्षप्रश्न कष्टकरी महिलांनी उपस्थित केला आहे.

-----------------

शहरात हॉटेल्सची संख्या : १२५

पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची साधारण संख्या : ३५०

--------------

कोट

घरात पती आजारी आहे. मुलगी लग्नाला आली आहे. आज, उद्या कधीतरी हॉटेल नियमित सुरू होतील आणि एकदाचा कायम रोजगार मिळेल, याची प्रतीक्षा आहे. मात्र, कोरोनाने जगणे हिरावले आहे.

- सिंधू वानखडे, अमरावती

---------

कोट

दारूच्या व्यसनाने तीन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. एक मुलगी, एक मुलगा असा सांभाळ करावा लागत आहे. घरी वृद्ध सासू असून, त्यांचे आजारपणाची जबाबदारी आहे. हॉटेलमध्ये भाजी-पोळी बनविण्यातून रोजगार तर मिळतो. पण उरलेल्या पोळी-भाकरीतून कुटुंबांची भूक भागविते

शैला मनवर, बडनेरा

---------------

कोट

दिवसा घर सांभाळून सायंकाळी ५ वाजतानंतर हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्यासाठी रोजगार मिळतो. मात्र, गत वर्षभरापासून रोजगार हिरावला आहे. महिलांना बाहेरील कामे करताना अनंत अडचणी येतात. हॉटेलमध्ये ठरावीक वेळेत कामे असल्याने ते सोयीचे ठरते. आता रोजगार नसल्याने कुटुंबात आर्थिक परवड होत आहे.

- पुष्पा मेश्राम, अमरावती.

-----------

सांगा! गरीबांनी जगावे नाही का?

कामावर गेल्याशिवाय चुल पेटत नाही. किमान हॉटेलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याच्या कामातून दिवसाला २५० ते ३०० रूपये रोजगार मिळतो. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून हॉटेल व्यवसायाला अवकळा आली आहे. हॉटेलमधील कूक, वेटर, हेल्पर यासह महिलांचा रोजगार हिरावला आहे. गरीब, श्रमजीवी महिलांसमोर कुटुंबाचा सांभाळ करताना मुलांचे शिक्षण, आरोग्याची दक्षता घ्यावी लागते. ‘काम नाही तर मजुरी नाही’ असा हॉटेल व्यवसायाचे

नियम आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये गरीबांनी जगावे नाही का? असा सवाल हाॅटलमध्ये पोळी-भाकरी बनविण्याचे काम करणाऱ्या महिलांनी उपस्थित केला आहे.