शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांकडून सन्मान तरीही मी अपात्र कसा?; शेतकऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:04 IST

प्रकरण पीएम किसान सन्मान योजनेचे

वरूड (अमरावती) : माझा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच अवलंबून आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ आठ हप्ते मिळाल्यानंतर मी अचानक अपात्र कसा ठरलो, असा सवाल करत तालुक्यातील जरूड येथील शेतकऱ्याने भारतीय संविधानाच्या सीपीसी कलम ८० अंतर्गत चक्क जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. शेतकऱ्याने लिखित जबाब मागितला असून तो न दिल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिक शेतकरी आशुतोष सतीश देशमुख (४०) यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे आजपर्यंत १६ हजार रुपये प्राप्त झाले होते; परंतु अचानकच त्यांना या सन्मान निधीसाठी आपण अपात्र असून मिळालेला निधी परत करावा, असा तहसीलदारांच्या सहीचा आदेश प्राप्त झाला. शेतकरी आशुतोष देशमुख यांनी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत, शेतकऱ्याला दिलेला सन्मान आपण परत कसा मागू शकता, असा प्रश्न तहसीलदार रवींद्र चव्हाण यांना विचारला. यावर या योजनेचा आमचा काहीही संबंध नाही, आम्ही फक्त वरून आलेल्या आदेशाचे पालन करणारे मध्यस्थ आहोत, असे उत्तर त्यांना मिळाले. यादरम्यान आशुतोष देशमुख यांनी पंतप्रधानांनी दिलेला सन्मान का परत करायचा, असा प्रश्न करीत जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

दरम्यान, काही विशिष्ट दलाल तालुक्यात वगळण्यात आलेल्या २४०० शेतकऱ्यांपैकी काहींच्या घरी जाऊन ही योजना पुन्हा सुरू करून देतो म्हणत पैसे उकळण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे पुढे आले आहे.

२०१४ मध्ये उदरनिर्वाह चालविण्यासाठी केवळ एक वर्षासाठी व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी त्याचा आयकरही भरला होता. त्यानंतर तो व्यवसाय बुडाला. आता मी केवळ शेती करीत असून कोणताही आयकर भरीत नाही. त्या एका वर्षासाठी प्रामाणिकपणे भरलेल्या टॅक्समुळे जर मी अपात्र ठरत असेल, तर शासनाने पाठविलेल्या या आदेशाचा निषेध आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत मिळालेली सन्मान राशी मी कोणत्याही परिस्थितीत परत करणार नाही. यासाठी न्यायालयात जावे लागले तरी चालेल.

- आशुतोष देशमुख, शेतकरी, जरूड

पीएम किसान सन्मान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारकडून आली आहे. आम्ही केवळ त्यांच्या आदेशाचे पालन करून शेतकऱ्यांना संबंधित आदेश पाठविले आहेत. शेतकरी पात्र-अपात्रतेबाबत आमच्या कार्यालयाचा कोणताही संबंध नाही.

- रवींद्र चव्हाण, तहसीलदार, वरुड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीAmravatiअमरावती