आरोग्य सेविकांना मिळणार न्याय
By Admin | Updated: September 8, 2016 00:20 IST2016-09-08T00:20:03+5:302016-09-08T00:20:03+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते दहा वर्षापासून सेवा देत आहे.

आरोग्य सेविकांना मिळणार न्याय
डिएचओंना सूचना : पालकमंत्र्यांकडून दखल
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते दहा वर्षापासून सेवा देत आहे. अशा ३३ आरोग्य सेविका आणि सेवकांना दोन वर्षापासून बदली होऊनही कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे याबाबत पालकमंत्र्याकडे याबाबत तक्रार येताच जिल्हा परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील कार्यरत ३३ आरोग्य सेविका व सेवकांच्या २४ मे रोजी आणि ११ मे २०१५ रोजी समुपदेशनाव्दारे बदल्या केल्या आहेत. परंतु अद्यापही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले नाही. याबाबत आॅगस्ट महिन्यात एक नव्हे तर दोनवेळा निवेदन दिल्यावरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता महिला आरोग्य सेविकांचाही मानसिकता ढासळलेली आहे. याबाबत ६ सप्टेंबर रोजी सीईओ किरण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. मात्र तरीही समाधान कारक तोडगा न काढल्याने या आरोग्य सेविकांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे निवेदन दिले होते.
यावेळी पुष्पा परांजपे, पुष्पा रामटेके, अश्र्विनी गुल्हाने, वैशाली कांबळे, चंदा बेलसरे, पद्मा जाधव, पल्लवी इंगोले, प्रिती तसरे, ललिता मेश्राम, अर्चना धुर्वे आदींची उपस्थित होती. या निवेदनानुसार पालकमंत्री यांनी झेडपीचे टिम प्रमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांच्याशी संपर्क करून १५ दिवसात योग्य तोडगा काढण्याचे निर्देश ७ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यामुळे अन्याग्रस्त आरोग्य सेविकांना न्याय मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)