शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

मेळघाटातील कुपोषित बालकांच्या जीवाशी आरोग्य विभागाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 10:36 IST

धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आरोग्य केंद्रांत स्त्री व बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती २७ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकही डॉक्टर दाखल झाला नसल्याची बाब उघडकीस आली.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी डॉक्टर गैरहजर, पंधराऐवजी सात दिवसांसाठी बाल व स्त्रीरोगतज्ज्ञ

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : पावसाळ्याचे दिवस आणि उच्च न्यायालयात दाखल याचिकेची दखल घेत, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने १५ दिवसांऐवजी केवळ आठवडाभरासाठी राज्यभरातील शेकडो किलोमीटर अंतरावरील स्त्रीरोग, बालरोग तज्ज्ञांना पाठविण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात सोमवारी एकही तज्ज्ञ हजर झाला नव्हता. त्यामुळे केवळ खानापूर्ती करण्यासाठीच मेळघाटातील आदिवासी बालके व मातांच्या जीवाशी खेळखंडोबा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यू होतात. अलीकडे मातामृत्यूही होत आहेत. त्यामुळे न्यायालयात पीआयएल दाखल असल्याने आदेशानुसार दरवर्षी शहरी भागातील स्त्रीरोग, बालरोग तज्ज्ञांना पंधरा दिवसांसाठी मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांत अतिजोखमीच्या माता, गंभीर दुर्धर आजाराने ग्रस्त बालक, कुपोषित बालक आदींची तपासणी, औषधोपचार करण्यासाठी पाठविण्यात येते. दि. २७ जून ते ४ जुलै दरम्यान राज्यातील गडचिरोली, सोलापूर, गोंदिया, अहमदनगर, पांढरकवडा, उस्मानाबाद, उल्हासनगर, भंडारा, सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून २६ स्त्री व बालरोग तज्ज्ञांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. परंतु, केवळ आदेशाचे पालन म्हणून काम केले जात असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्वीच आरोग्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली होती.

सोमवारी एकही डॉक्टर हजर नाही

धारणी व चिखलदरा तालुक्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आरोग्य केंद्रांत स्त्री व बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती २७ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आली. प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही डॉक्टर दाखल झाला नसल्याची बाब उघडकीस आली. शेकडो किलोमीटरवरील डॉक्टरांची सेवा सात दिवसांकरिता घेण्यात आली आहे. यात गैरहजर राहता येत नाही. यामुळे नजीकच्या जिल्ह्यातून डॉक्टर पाठविले असते, तर ते तातडीने उपलब्ध झाले असते, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.

मेळघाटात पंधरवड्यासाठी दरवर्षी तज्ज्ञ डॉक्टर पाठविले जातात. यावेळी सात दिवसांचे पत्र आले आहे. एकूण २६ तज्ज्ञ आहेत. २७ जूनपासून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :Healthआरोग्यMelghatमेळघाटdoctorडॉक्टर