शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

हापूस, गुलाबखस, दशेरीची धूम

By admin | Updated: April 28, 2015 00:15 IST

उन्हाळा सुरु होताच बाजारपेठेत विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल होतात.

परप्रांतीय आंब्याचा बोलबाला : अवकाळी पावसाने उत्पादन घसरलेलोकमत विशेषअमरावती : उन्हाळा सुरु होताच बाजारपेठेत विविध जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात रत्नागिरीचा हापूस बाजारात दाखल झाला असला तरी तो खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर होते. त्यामुळे काही ठराविक घटकांनीच हापूसची चव चाखली. आता एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले असून यात परप्रांतिय आंब्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादनाला बसल्याची माहिती आहे.सध्या स्थानिक फळबाजारात बंगळूर, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ या राज्यात उत्पादित होणारे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मागविले जात आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दरदिवसाला पाच ते सहा ट्रक आंबे येत असून जिल्हाभरातील घाऊक फळविक्रेते त्यांची खरेदी करीत आहेत, अशी माहिती ठोक आंबा विके्रते अ. रज्जाक अ. रफिक यांनी दिली. कार्बाईडने आंबे पिकविण्यावर बंदी असल्याने त्याचा थोडाफार परिणाम व्यवसायावर जाणवतो आहे. परंतु नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे विकण्याची तयारी आहे. या नैसर्गिक प्रक्रियेसाठी तीन ते चार दिवस आंबे साठवून ठेवावे लागतात. अन्न व औषधी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सर्वच घाऊक आंबा विक्रेत्यांना कळविण्यात आले आहे. विष प्रयोग केल्याचे गुन्हे दाखल करुन घेतल्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आता नागरिकांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विक्रेते अ. रज्जाक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. काही दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळाने आंबे उत्पादनावर चांगलाच फटका बसला आहे. परप्रांतातून अमरावतीच्या बाजारपेठेत येणारे आंबे हे डागयुक्त असल्याने या आंब्याना भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गावरान आंबे दुर्मिळ झाले असून हल्ली परप्रांतीय आंब्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, असे अ. रज्जाक म्हणाले.घाऊक बाजारात बंगळूरचा हापूस प्रती किलो १०० रुपये दराने विकला जात आहे. तसेच केरळचा गुलाबखस १०० ते १२० रुपये, लालबाग ५० ते ६० रुपये तर आंध्रप्रदेशचा दशेरी ५० ते ६० रुपये, तोतापुरी ३० ते ४० रुपये, लंगडा ५० ते ६० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. तसेच रत्नागिरी व देवगडचा हापूस प्रती डझन ५०० ते ८०० रुपये दराने विक्री होेत असल्याची माहिती अमर फ्रूट भंडारच्या संचालकांनी दिली. मे महिन्यात उत्तरप्रदेशातील लालबाग, केसर तर आंध्रप्रदेशातील बैगनपल्ली विक्रीसाठी येतील, अशी माहिती आहे. रत्नागिरीचा हापूस सामान्यांना खरेदी करणे कठीण असल्याने बहुतांश लोक बंगळूरचा हापूस खरेदी करुन आंब्याची चव चाखत आहेत. फळबाजारातील चित्र बघितले तर हापूस, गुलाबखस, लालबाग, दशेरी, लंगडा जातीच्या आंब्यांना मागणी आहे. एकूण अमरावतीकरांना परप्रांतीय आंब्यावरच निर्भर रहावे लागत आहे.मे महिन्यात हापूसचे दर घसरण्याची शक्यताहल्ली फळबाजारात रत्नागिरी, देवगडचा हापूस भाव खाऊन जात आहे. ५०० ते ८०० रुपये प्रती डझन दराने हापूस आंबे विकले जात आहे. मात्र, मे महिन्यात अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली की, हापूस आंब्याचे दर प्रती डझन २०० ते ३०० रुपयांनी घरसण होईल, अशी माहिती फळ विक्रते राजा मोटवानी यांनी दिली. हापूस प्रारंभी एक हजार रुपये प्रती डझन दराने विकण्यात आला आहे, हे विशेष.