शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 11, 2023 16:54 IST

पश्चिम विदर्भात १४,५०० हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला, फळपिके बाधित

अमरावती : मार्च महिन्यात दोन वेळा वादळासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये पश्चिम विदर्भातील २६,१३२ शेतकऱ्यांच्या १४,४५९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २४.५८ कोटींचा निधी शासनाने सोमवारी मंजूर केला. शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या शासन मदतीमध्ये २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार सुधारणा केलेली आहे व या वाढीव दरानुसार आता बाधित पिकांसाठी मदत देण्यात येणार आहे.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत मार्च महिन्यात तीन वेळा गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ३१ मार्चला झालेल्या आपत्तीचे पंचनामे एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दोन वेळा आपत्तीने नुकसान झाले. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता जिल्हास्तरावर पंचनामे पूर्ण झाल्यावर ३३ टक्क्यांवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत व याद्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्या खात्यामध्ये शासनस्तरावरून निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

जिल्हानिहाय मंजूर निधी

अमरावती जिल्ह्यातील बाधित १३७० हेक्टरसाठी २.३८ कोटी, अकोला जिल्ह्यातील २५९३ हेक्टरसाठी ४.४९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ४,०२६ हेक्टरसाठी ६.९१ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ४८२३ हेक्टरसाठी ७.९२ कोटी व वाशिम जिल्ह्यात १६४४ हेक्टरसाठी २.८६ कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर करण्यात आले आहे.

सततच्या पावसाच्या नुकसानीची व्याख्या करण्यात येऊन आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अवकाळीसह गारपिटीने बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना शासन मदत देण्यात येत आहे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावतीfundsनिधी