शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 11, 2023 16:54 IST

पश्चिम विदर्भात १४,५०० हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला, फळपिके बाधित

अमरावती : मार्च महिन्यात दोन वेळा वादळासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये पश्चिम विदर्भातील २६,१३२ शेतकऱ्यांच्या १४,४५९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २४.५८ कोटींचा निधी शासनाने सोमवारी मंजूर केला. शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या शासन मदतीमध्ये २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार सुधारणा केलेली आहे व या वाढीव दरानुसार आता बाधित पिकांसाठी मदत देण्यात येणार आहे.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत मार्च महिन्यात तीन वेळा गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ३१ मार्चला झालेल्या आपत्तीचे पंचनामे एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दोन वेळा आपत्तीने नुकसान झाले. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता जिल्हास्तरावर पंचनामे पूर्ण झाल्यावर ३३ टक्क्यांवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत व याद्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्या खात्यामध्ये शासनस्तरावरून निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

जिल्हानिहाय मंजूर निधी

अमरावती जिल्ह्यातील बाधित १३७० हेक्टरसाठी २.३८ कोटी, अकोला जिल्ह्यातील २५९३ हेक्टरसाठी ४.४९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ४,०२६ हेक्टरसाठी ६.९१ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ४८२३ हेक्टरसाठी ७.९२ कोटी व वाशिम जिल्ह्यात १६४४ हेक्टरसाठी २.८६ कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर करण्यात आले आहे.

सततच्या पावसाच्या नुकसानीची व्याख्या करण्यात येऊन आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अवकाळीसह गारपिटीने बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना शासन मदत देण्यात येत आहे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावतीfundsनिधी