शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 11, 2023 16:54 IST

पश्चिम विदर्भात १४,५०० हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला, फळपिके बाधित

अमरावती : मार्च महिन्यात दोन वेळा वादळासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये पश्चिम विदर्भातील २६,१३२ शेतकऱ्यांच्या १४,४५९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २४.५८ कोटींचा निधी शासनाने सोमवारी मंजूर केला. शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या शासन मदतीमध्ये २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार सुधारणा केलेली आहे व या वाढीव दरानुसार आता बाधित पिकांसाठी मदत देण्यात येणार आहे.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत मार्च महिन्यात तीन वेळा गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये ३१ मार्चला झालेल्या आपत्तीचे पंचनामे एक-दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दोन वेळा आपत्तीने नुकसान झाले. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता जिल्हास्तरावर पंचनामे पूर्ण झाल्यावर ३३ टक्क्यांवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत व याद्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर त्या खात्यामध्ये शासनस्तरावरून निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

जिल्हानिहाय मंजूर निधी

अमरावती जिल्ह्यातील बाधित १३७० हेक्टरसाठी २.३८ कोटी, अकोला जिल्ह्यातील २५९३ हेक्टरसाठी ४.४९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ४,०२६ हेक्टरसाठी ६.९१ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ४८२३ हेक्टरसाठी ७.९२ कोटी व वाशिम जिल्ह्यात १६४४ हेक्टरसाठी २.८६ कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर करण्यात आले आहे.

सततच्या पावसाच्या नुकसानीची व्याख्या करण्यात येऊन आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अवकाळीसह गारपिटीने बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना शासन मदत देण्यात येत आहे, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावतीfundsनिधी