शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

11 तालुक्यांतील भूजल स्थिती जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झाला.

ठळक मुद्देभातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजारात १.२० मीटर वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार वर्षांत प्रथमच १० तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. सद्यस्थितीत केवळ भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात १.२० मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. उर्वरित ११ तालुक्यांत मात्र भूर्गभातील पाण्याची पातळी ०.५० मीटरचे आतच असल्याने मार्चपश्चात जिल्ह्यास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झाला.गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे १७ दिवस राहिले व सरासरीच्या १३१ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात २३ दिवस पाऊस पडला. सरासरीच्या ९८ टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले व सरासरी ७७ टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात १६ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ९३.१० टक्के पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या ९०.२ टक्के पाऊस पडला. गतवर्षी पावसाळा पश्चात मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. यापूर्वी सलग चार वर्षे भूजलात कमी आल्यामुळे सध्या तीन तालुक्यांत १.२० मीटरपर्यंत वाढ व ११ तालुक्यांत ०.५० मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.

भूजल पातळीत सरासरी ०.५० मीटर वाढ‘जीएसडीए’द्वारे १४ तालुक्यांतील १५० निरीक्षण विहिरीच्या पाहणीअंती जिल्ह्यात सरासरी ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. सद्यस्थितीत भातकुली १,०४ मी., चांदूर रेल्वे १.३४ मी व चांदूर बाजार तालुक्यात १.०३ मीटर भूजल पातळी आहे. याशिवाय अमरावती ०.२०, नांदगाव खंडेश्वर व तिवसा ०.३४, मोर्शी ०.५६, वरूड ०.६१, अचलपूर ०.००, दर्यापूर ०.१९ , अंजनगाव ०.१५, धारणी०.२९, चिखलदरा ०.०५ व धामणगाव तालुक्यात ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झालेली आहे.

भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजलाचा अनिर्बंध उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत पुनर्भरण होत नाही. भूजलस्रोत कायम टिकविणे व पुनर्भरणात होणारी तूट भरून काढण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाच्या योजना राबविणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गावोगावी नवीन बोअर व त्याद्वारे उपशावरदेखील बंधने आणणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाच्या अमर्याद उपशावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधने आणली होती.

 

टॅग्स :Waterपाणी