शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

११ तालुक्यांत भूजलस्थिती जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST

अमरावती : चार वर्षांत प्रथमच १० तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती ...

अमरावती : चार वर्षांत प्रथमच १० तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. सद्यस्थितीत केवळ भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात १.२० मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. उर्वरित ११ तालुक्यांत मात्र भूर्गभातील पाण्याची पातळी ०.५० मीटरचे आतच असल्याने मार्चपश्चात जिल्ह्यास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झालेला आहे.

गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे १७ दिवस राहिले व सरासरीच्या १३१ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात २३ दिवस पाऊस पडला. यात सरासरीच्या ९८ टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले व सरासरी ७७ टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात १६ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ९३.१० टक्के पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या ९०.२ टक्के पाऊस पडला. तसे पाहता मागील वर्षी पावसाळा पश्चात मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. यापूर्वी सलग चार वर्षे भूजलात कमी आल्यामुळे सध्या तीन तालुक्यांत १.२० मीटरपर्यंत वाढ व ११ तालुक्यांत ०.५० मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.

बॉक्स

सरासरी ०.५० मीटर भूजल पातळीत वाढ

‘जीएसडीए’द्वारा १४ तालुक्यांतील १५० निरीक्षण विहिरीच्या पाहणीअंती जिल्ह्यात सरासरी ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. सद्यस्थितीत भातकुली १,०४ मी., चांदूर रेल्वे १.३४ मी व चांदूर बाजार तालुक्यात १.०३ मीटर भूजल पातळी आहे. याशिवाय अमरावती ०.२०, नांदगाव खंडेश्वर व तिवसा ०.३४, मोर्शी ०.५६, वरुड ०.६१, अचलपूर ०.००, दर्यापूर ०.१९ , अंजनगाव ०.१५, धारणी०.२९, चिखलदता ०.०५ व धामणगाव तालुक्यात ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झालेली आहे.

बॉक्स

भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजलाचा अनिर्बंध उपसा होत आहे. त्यातुलनेत पुनर्भरण होत नाही. भूजलस्रोत कायम टिकविणे व पुनर्भरणात होणारी तूट भरून काढण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाच्या योजना राबविणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गावोगावी होणारे बोअर व त्याद्वारे होणाऱ्या उपस्यावरदेखील बंधने आणणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाच्या अमर्याद उपस्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधने आणली होती.