शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पीक संरक्षण उपकरणाच्या अनुदान वाटपात घोळ

By admin | Updated: May 29, 2014 01:38 IST

राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या पीक संरक्षण उपकरणाचे काही ठिकाणी ५0 टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला.

राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या पीक संरक्षण उपकरणाचे काही ठिकाणी ५0 टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला. एका शेतकर्‍याने कृषी विभागाच्या या धोरणाला कंटाळून अनुदानाचा धनादेश जिल्हा कृषी अधीक्षक यांना परत देऊन चौकशीची मागणी केली आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत पीक संरक्षण उपकरणाच्या खरेदीवर ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त १७,५00 रुपये र्मयादेत अनुदान देण्याची योजना २0१0-११ पासून लागू करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक हे या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी आहेत.

२0१0-११ या वर्षापासून सुरु झालेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांनी खरेदी केलेल्या उपकरणाच्या किमतीच्या ५0 टक्के अनुदान १७,५00 रुपयांच्या र्मयादेत देण्यात आले. सन २0१३-१४ या वर्षात मोर्शी तालुक्यातील काही लाभार्थी शेतकर्‍यांना ५0 टक्के तर काही शेतकर्‍यांना ५0 टक्के पेक्षाही कमी अनुदानाचे धनादेश देण्यात आले.

तालुक्यातील लेहेगाव येथील शेतकरी अरविंद तट्टे यांनी २३,१00 रुपयाचा होंडा शोल्डर पंप खरेदी केला. त्यांना ५0 टक्के अनुदानाची रक्कम ११,५५0 रुपये मिळणे आवश्यक होते. परंतु जिल्हा कृषी अधीक्षकांनी अरविंद तट्टे यांच्या नावाने ७,८५0 रुपयांचा धनादेश काढला. तट्टे यांनी ५0 टक्के अनुदानाची योजना असताना रक्कम कमी का काढण्यात आली, या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांना सर्मपक उत्तर देण्यात आले नाही. शेवटी तट्टे यांनी धनादेश तक्रारीसह जिल्हा कृषी अधीक्षकांना परत दिला.

या संदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत अरविंद तट्टे यांनी लाभार्थी आणि त्यांना दिलेल्या अनुदानाची २0१३-१४ या वर्षातील माहिती मागितली. १८ लाभार्थ्यांना सरसकट प्रत्येकी ७,८५0 रुपयांच्या अनुदानाचा लाभ देण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित शेतकर्‍यांना ७८५0 या दराने कोणत्या नियमाने किंवा शासन आदेशाने अनुदान देण्यात आले हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.

या योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांंत आणि चालू वर्षातही काही ठिकाणी ५0 टक्के अनुदान देण्यात आले ते चुकीचे ठरत असेल तर आतापर्यंत ज्या अधिकार्‍यांनी ५0 टक्के अनुदानाचे वाटप केले, त्यांच्या वेतनातून अतिरिक्त प्रदान केलेली रक्कम शासनाने वसूल करावी अन्यथा योजनेत दर्शविल्या प्रमाणे सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना १७,५00 रुपयांच्या र्मयादेत ५0 टक्के लाभ मिळवून द्यावा, शिवाय त्यापेक्षा कमी लाभ दिल्याप्रकरणी चौकशी करुन संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कृषी सहसंचालकांकडे करण्यात आली.