शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

शासन उदासीन, साझांची संख्यावाढ रखडली

By admin | Updated: March 31, 2017 00:20 IST

वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे.

तलाठ्यांवर ताण : लोकसंख्येच्या प्रमाणात ४० साझा वाढणार अमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्या वाढविण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात ४० साझा वाढणार आहेत. यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला. मात्र अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे गेल्या वर्षापासून प्रस्ताव बासनात पडला आहे. तीन दशकांत लोकसंख्या कित्येकपटीने वाढली. मात्र तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामांचा बोजा वाढल्याने तलाठी सज्जांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त सदस्य असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेला अहवाल वर्षभऱ्यापूर्वी सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली व अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे याविषयी आग्रही होते. मात्र त्यांच्यानंतर हा विषय तूर्तास बासनात गुंडाळला गेला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांत ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. जिल्ह्यात ४०० तलाठी साझे आहेत व वाढत्या शेतकरी खातेदारांच्या १० प्रकरणांत म्हणजेच जिल्ह्यात नव्याने ४० तलाठी साझे वाढणार आहे. यामुळे तलाठ्यांवर ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी शासनस्तर पाठपुरावा होणे महत्त्वाचे आहे. १९८३ मध्ये झाली होती तलाठी सज्जांची निर्मिती राज्यातील तलाठी सज्ज निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी १९७४ मध्ये कपूर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार १९८३ मध्ये तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. सद्यस्थितीत राज्यात १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. मात्र वाढता कामाचा बोजा असल्यामुळे सज्जांची वाढ करण्याची मागणी तलाठी संघटनेद्वारा होत असल्याने सज्जांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय सरकारने २०१४ मध्ये घेतला. (प्रतिनिधी)