शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘प्रहार’च्या भावना आरपारच्या, तोडाफोड करून बाहेर पडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 23:51 IST

आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार रवि राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत. काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री ८ वाजता मुंबईला निघाल्याची माहिती कडू यांनी दिली.आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र, आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे. मला असे वाटते, आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक, त्याने जे काही आरोप केले, त्यासंदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले, तर १ नोव्हेंबर रोजी ‘अल्टिमेटम’बाबतचा विचार करू आणि जी बदनामी केली आहे ती परत द्यावी, विषय संपला, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

आमदार रवि राणा मुंबईला पोहोचलेआमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली आहे. त्यानुसार आमदार रवि राणा हे रविवारी सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास मुंबईला गेले. आमदार बच्चू कडू यांनी रविवारी रात्री ८ वाजता मुंबईला निघणार असल्याचे सांगितले. 

कडू, राणा यांच्यात मनोमीलनाचे संकेतमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रवि राणा व बच्चू कडू यांना रविवारी मुंबईला बोलावले. त्यांच्यात उफळलेला वाद शिंदे-फडणवीस दूर करण्याची व रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत मनोमीलन होण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणा