शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातील गंगाधरस्वामी मठात १०५५ वर्षांची गणेशपरंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:02 AM

जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे.

ठळक मुद्देलोटांगणाची परंपरा भाविकांची अपार श्रद्धासर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरला उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. येथील विसर्जन सोहळा देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाविक विसर्जन स्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड किमी अंतर दगड-धोंड्यातून लोटांगण घालत येतात. ही दैवी अनुभूती मानली जाते.या मठाच्या स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही आहे. बाराव्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरणार्थी देशाच्या विविध भागात विखुरले गेले. शरणार्थी बालबस्व यांना घेऊन येथे राहत असताना ते अचानक बेपत्ता झाले. ते परत यावेत, यासाठी गणेशाची आराधना केली आणि नवस बोलला. बालबस्व धावत येऊन त्यांना बिलगले. त्यांनी गणेशाची स्थापना केली आणि गणेशोत्सव प्रारंभ केला, अशी आख्यायिका आहे. गणेशाची स्थापना करण्यात आली, त्याठिकाणी आजही विधीवत माती ठेवली जाते. या मातीवर काशीखंड या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. यानंतर अमरावती येथील मूर्तिकार आजणे यांच्याकडून पारंपरिक स्वरूपाची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती घडविली जाते.मठाधिपतींकडून आस्थेवाईक चौकशीगंगाधर स्वामींच्या काळात शंभराहून अधिक दिंड्या गणेशोत्सवात सहभागी व्हायच्या. आतादेखील दहा दिवस भाविक व गावकऱ्यांना मठातर्फे अन्नदान केले जाते. विद्यमान मठाधिकारी शिवशंकर शिवाचार्य स्वामी पंगतीत फिरून काय हवं-नको, याची विचारपूस करतात.सामाजिक सौहार्दाचे प्रतीकमठाव्यतिरिक्त गावात पन्नासावर गणेश मंडळे आहेत. काही मंडळांचे अध्यक्ष तर मुस्लिम बांधव राहिले आहेत. मठातील आरतीला सर्वधर्मीयांची उपस्थिती असते. विसर्जन सोहळ्याच्या अग्रभागी मठाचा गणपती, मागे मंडळांचा व त्यानंतर घरगुती गणेशमूर्ती असतात. मुस्लिम भागातून जाणाऱ्या

 मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करतात. मिरवणुकीत दिंड्या, ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक देखाव्यांचा समावेश असतो.भाविक घालतात लोटांगणविसर्जन स्थळापासून ते मठापर्यंत मार्गातील दगड-धोंडे पार करून, उन्हाची पर्वा न करता भाविक लोटांगण घालतात. मठातील विहिरीच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगणादरम्यान कुणालाही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८