शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गाडगेबाबा थोर वऱ्हाडी साहित्यिक: सतीश तराळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 18:32 IST

शालेय शिक्षणही न लाभलेले संत गाडगेबाबा वऱ्हाडी  बोलीचे सर्वात मोठे साहित्यिक होते. त्यांचे कीर्तन ही उत्कृष्ट ललितकृतीच आहे.

अमरावती : शालेय शिक्षणही न लाभलेले संत गाडगेबाबा वऱ्हाडी  बोलीचे सर्वात मोठे साहित्यिक होते. त्यांचे कीर्तन ही उत्कृष्ट ललितकृतीच आहे. वऱ्हाडी बोलीचा महाराष्ट्रभर  प्रभावी प्रचार, प्रसार त्यांनी केला.वऱ्हाडीचे रंजन-प्रबोधनाचे सामर्थ्य त्यांनी आधोरेखित केले. अशा आशयाचे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी सतीश तराळ यांनी काढले. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय सभागृहात वऱ्हाडी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सतीश तराळ बोलत होते.

दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, प्राचार्य  संयोगिता देशमुख, वऱ्हाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा.  चव्हाण, स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदी  व्यासपीठावर उपस्थित होते.

सतीश तराळ पुढे म्हणाले, गाडगेबाबांच्या १२ हजार कीर्तनांपैकी फक्त एकच शेवटचे कीर्तन उपलब्ध असल्यामुळे फार मोठ्या वऱ्हाडी वाङ्मयीन मेव्याला आपण मुकलो आहोत. ही फार मोठी वाङ्मय हानी आहे. ते पुढे म्हणाले, बोलीच भाषेला ऊर्जा, सत्व, शक्ती, गोडवा प्रदान करते. म्हणून बोलींचे जतन भाषा संवर्धनासाठी आवश्यक असते. बोली भाषेच्या बलस्थान असतात. मराठी भाषेतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’च्या निर्मितीत वऱ्हाडीचे योगदान आहे. वऱ्हाडी बोलीतील कथा, कादंबरी, कविता, वाङ्मयाचे सामर्थ्य तराळ यांनी स्पष्ट केले. वऱ्हाडी साहित्यात ललित निबंध, आत्मचरित्र, चरित्र, समीक्षक, नाटके, बाल साहित्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य निर्मितीत बोलीचे महत्त्व विस्ताराने स्पष्ट केले. याप्रसंगी प्राचार्य  संयोगिता देशमुख यांनीही विचार मांडले. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी स्वागतपर भाषण केले. भूमिका कथन वºहाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. याप्रसंगी रमेश अंधारे, केशव तुपे, दिनकर दाभाडे,  हास्यसम्राट मिर्झा रफी महमद बेग, रामचंद्र काळुंखे आदी मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Amravatiअमरावती