शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

गाडगेबाबा थोर वऱ्हाडी साहित्यिक: सतीश तराळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 18:32 IST

शालेय शिक्षणही न लाभलेले संत गाडगेबाबा वऱ्हाडी  बोलीचे सर्वात मोठे साहित्यिक होते. त्यांचे कीर्तन ही उत्कृष्ट ललितकृतीच आहे.

अमरावती : शालेय शिक्षणही न लाभलेले संत गाडगेबाबा वऱ्हाडी  बोलीचे सर्वात मोठे साहित्यिक होते. त्यांचे कीर्तन ही उत्कृष्ट ललितकृतीच आहे. वऱ्हाडी बोलीचा महाराष्ट्रभर  प्रभावी प्रचार, प्रसार त्यांनी केला.वऱ्हाडीचे रंजन-प्रबोधनाचे सामर्थ्य त्यांनी आधोरेखित केले. अशा आशयाचे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी सतीश तराळ यांनी काढले. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय सभागृहात वऱ्हाडी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पहिल्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सतीश तराळ बोलत होते.

दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, प्राचार्य  संयोगिता देशमुख, वऱ्हाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा.  चव्हाण, स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर आदी  व्यासपीठावर उपस्थित होते.

सतीश तराळ पुढे म्हणाले, गाडगेबाबांच्या १२ हजार कीर्तनांपैकी फक्त एकच शेवटचे कीर्तन उपलब्ध असल्यामुळे फार मोठ्या वऱ्हाडी वाङ्मयीन मेव्याला आपण मुकलो आहोत. ही फार मोठी वाङ्मय हानी आहे. ते पुढे म्हणाले, बोलीच भाषेला ऊर्जा, सत्व, शक्ती, गोडवा प्रदान करते. म्हणून बोलींचे जतन भाषा संवर्धनासाठी आवश्यक असते. बोली भाषेच्या बलस्थान असतात. मराठी भाषेतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’च्या निर्मितीत वऱ्हाडीचे योगदान आहे. वऱ्हाडी बोलीतील कथा, कादंबरी, कविता, वाङ्मयाचे सामर्थ्य तराळ यांनी स्पष्ट केले. वऱ्हाडी साहित्यात ललित निबंध, आत्मचरित्र, चरित्र, समीक्षक, नाटके, बाल साहित्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य निर्मितीत बोलीचे महत्त्व विस्ताराने स्पष्ट केले. याप्रसंगी प्राचार्य  संयोगिता देशमुख यांनीही विचार मांडले. स्वागताध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी स्वागतपर भाषण केले. भूमिका कथन वºहाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष का.रा. चव्हाण यांनी केले. संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. याप्रसंगी रमेश अंधारे, केशव तुपे, दिनकर दाभाडे,  हास्यसम्राट मिर्झा रफी महमद बेग, रामचंद्र काळुंखे आदी मंडळी उपस्थित होती.

टॅग्स :Amravatiअमरावती