शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शहरातील भाजी,फळ बाजार १७ पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे ख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शहर, जिल्हा सीमेवर वाहनांना प्रतिबंधाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढविण्यात आलेला आहे. आता १७ मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत शहरात बाजार समितीचे फळ व भाजीपाला यार्ड, सायन्सकोअर, दसरा मैदान येथील भाजीपाला विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी रविवारी जारी केले आहेत.शहरासह जिल्ह्यात ४ ते १७ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना सकाळी ८ ते दुपारी १२ या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता संचारबंदीत शिथिलता आहे.लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे मुख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षांआतील मुले यांनी आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारचे कटींग, सलून, स्पा आदी सर्व दुकाने या कालावधीत बंद राहतील. शासकीय, खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे. याबाबतची जबाबदारीही संबंधित कार्यालय प्रमुखांची राहील व या कार्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.उल्लंघन केल्यास शिक्षापात्र गुन्हाया संचारबंदीच्या काळात शहर किंवा ग्रामीणमधील कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केल्याचे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पीएसआय दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाºयास जिल्हाधिकाºयांनी प्राधिकृत केले आहे.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे