शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शहरातील भाजी,फळ बाजार १७ पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे ख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शहर, जिल्हा सीमेवर वाहनांना प्रतिबंधाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढविण्यात आलेला आहे. आता १७ मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत शहरात बाजार समितीचे फळ व भाजीपाला यार्ड, सायन्सकोअर, दसरा मैदान येथील भाजीपाला विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी रविवारी जारी केले आहेत.शहरासह जिल्ह्यात ४ ते १७ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना सकाळी ८ ते दुपारी १२ या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता संचारबंदीत शिथिलता आहे.लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे मुख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षांआतील मुले यांनी आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारचे कटींग, सलून, स्पा आदी सर्व दुकाने या कालावधीत बंद राहतील. शासकीय, खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे. याबाबतची जबाबदारीही संबंधित कार्यालय प्रमुखांची राहील व या कार्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.उल्लंघन केल्यास शिक्षापात्र गुन्हाया संचारबंदीच्या काळात शहर किंवा ग्रामीणमधील कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केल्याचे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पीएसआय दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाºयास जिल्हाधिकाºयांनी प्राधिकृत केले आहे.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे