शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तडीपार गुंडांचा मुक्त वावर; पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ ठरली कुचकामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:31 IST

एकाच रात्री चार तडीपार गवसले : पोलिस आयुक्तांचा लक्षवेध

अमरावती : शहरातून तडीपार केल्यानंतरही मुक्तपणे वावरणाऱ्या चार गुंडांना एकाच रात्रीतून पकडण्यात आले. १६ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. समाजस्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी दोन वर्षांकरिता शहर तथा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले गुंड शहरात, घरात परततात तरी कसे? तडीपार गुंड मुक्तपणे फिरत असताना संबंधित पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ करते तरी काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

शहर गुन्हे शाखेने १६ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ७:४० च्या सुमारास रियाय खान हयात खान (२९, रा. सागरनगर, अमरावती) याला खोलापुरी गेट भागातून अटक केली. १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत तो दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने मुक्तपणे फिरताना आढळून आला. त्याला दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच दरम्यान सकाळी ७:३० ते ८ च्या दरम्यान लच्छू ऊर्फ शेख इस्राईल वल्द शेख इस्माईल ऊर्फ कल्लू (२८, रा. हैदरपुरा) या तडीपार गुंडालादेखील अटक करण्यात आली.

शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले असताना ते आदेश डावलून तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरात प्रवेशला. त्याला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. १६ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास निखिल काळे (२७, रा. काटआमला) या गुंडाला बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तडीपारीचे आदेश डावलून फिरत असताना अटक करण्यात आली. त्याला १७ जून २०२२ च्या आदेशानुसार शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर १६ जानेवारी रोजी दुपारी ५:१० च्या सुमारास अमर सुखदेव यादव (२२) याला त्याच्या छत्रसाल नगर येथील घरासमोरूनच अटक करण्यात आली. त्याला १९ डिसेंबर २०२२ च्या आदेशाने तडीपार करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारी उल्लंघनाचा गुन्हा नोंदविला. एकाच दिवशी या चार कारवाया करण्यात आल्या.

डीबी कशात बिझी?

वास्तविक, ज्या गुंडांना तडीपार करण्यात आले, ते गुंड आदेश डावलून शहरात, घरी येतात का, हे तपासण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील डीबी स्कॉडची असते. मात्र, डीबी पथकाच्या नाकावर टिच्चून कधी नव्हे ते एकाच दिवशी चार तडीपारांना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेने यश मिळविले. त्यामुळे डीबीची कार्यप्रणाली पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागे एकदा राजापेठच्या हद्दीत तडीपार आरोपीने स्टेट बँक कॉलनी गाठून दुचाकी चोरली होती. तर फ्रेजरपुऱ्यातील एका तडीपाराने शहर गाठून गायीवर चाकूहल्ला करून तिचा जीव घेतला होता हे विशेष.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती