शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

रोजगार हमीतून दरवळणार निशिगंधा मोगर्‍याचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST

अमरावती : शेतकरी आर्थिकरीत्या बळकट व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने फळपीक ...

अमरावती : शेतकरी आर्थिकरीत्या बळकट व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने फळपीक लागवडीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे शिवारात निशिगंधा मोगऱ्यासह गुलाबाचा सुगंध दरवळण्यास मदत होणार आहे.

एका वर्षाकरिता प्रतिहेक्‍टर दोन लाख रुपयांचे अनुदान देय राहणार आहे. फुलपिके लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत राहील. या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. अनेक वर्षापासून रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून फूल लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. याची राज्य शासनाने दखल घेतली असून या योजनेतून निशिगंधा, मोगरा गुलाबांची लागवड करून फुलशेती केली जाणार आहे. संचालक फलोद्यान यांच्यामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर विभागाकडून या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर कारवाईची सूचना दिली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी लाभार्थींची निवड क्षेत्रीय स्तरावर करावी. फुलपीक लागवड कार्यक्रमामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. मग्रारोहयोसाठी जॉब कार्डवरील प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. याकरिता लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.

बॉक्स

ग्रामसभेची घ्यावी लागणार मंजुरी

फुल पिकाच्या लागवडीसाठी ग्रामपंचायत ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. लाभार्थी निवडीची कारवाई दरवर्षी एप्रिलअखेर पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करावी लागणार आहे. कामाचे नियोजन करताना कृषी व संलग्न कामे ६० टक्के घेतले जातील. याची दक्षता घ्यावी लागणार आहे. एका वर्षाकरिता प्रति हेक्‍टरी दोन लाख रुपये एवढे अनुदान देय राहील. फुलबाग लागवडीसाठी कृषी सहायक तांत्रिक मार्गदर्शन करतील. या योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरीचे अधिकार तालुका कृषी अधिकारी व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.