शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नांदगाव तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:09 PM

ग्रामीण भागात तब्बल तीन दिवसांत चार डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. टिमटाला येथे तीन, तर कोठोडा या गावात एक रुग्ण आहेत.

ठळक मुद्देटिमटाला येथे तीन, कोठोड्यात एक : खासगी रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागात तब्बल तीन दिवसांत चार डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. टिमटाला येथे तीन, तर कोठोडा या गावात एक रुग्ण आहेत. सदर चारही रुग्ण हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, राजापेठ येथील एका खासगी डॉक्टरांकडे ते उपचार घेत आहे.ग्रामीण भागात डेंग्यू या आजाराने डोकेवर काढले असताना, मात्र ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर गावात स्वच्छता अभियान राबवून गावातील स्वच्छता त्वरित करावी तसेच गावकºयांना डेंग्यू या आजारासंदर्भात जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. खासगी पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. पण, जोपर्यंत यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत डेंग्यूचे संशयित रूग्ण मानावे, असे शासकीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे असते. त्यामुळे खासगी डॉक्टर रुग्ण पॉझिटिव्ह असल्यानंतरही मान्य करण्यास तयार नसतात. मात्र साथ वाढू नये, सामाजिक जाण व सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून खासगीत ते ‘लोकमत’ला रुग्णांची माहिती देतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सदर रूग्णांचे नमुने घेऊन ते पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही, यासंदर्भात तपासणी करावी व त्या गावात स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी होत आहे.सदर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे, हे विशेष!