शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 16:24 IST

विद्यमान सरकारने वैद्यकीय महाविद्यालसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे टोपे म्हणाले

अमरावती : देशभरात महागाई व बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच राज्यात होणारे मोठ-मोठे प्रकल्प हे गुजरातला पळविण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. परंतु राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार असून, रिमोट केंद्राकडे असल्याचा सूचक निशाणा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून साधला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी राजेश टोपे हे शहरात आले होते.

हिवाळी अधिवेशन हे १९ डिसेंबरपासून नागपूरला सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने राज्य सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी तसेच विदर्भाच्या विविध समस्या संदर्भात राष्ट्रवादीकडून महामोर्चा नागपूर अधिवेशनावर काढण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेतून टोपे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

टोपे म्हणाले, राज्यातील वेदांत सारखे मोठे प्रकल्प हे सरकारच्या नजरेसमोरून गुजरातला पळविण्यात आले. विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. पीक विमा कंपन्यांचे कार्यालय जिल्ह्यात नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेले प्रोत्साहन अनुदानही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची टीका राजेश टोपे यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रामाणिक प्रयत्न

अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्येही या प्रश्नावर चर्चा केली होती. विद्यमान सरकारने वैद्यकीय महाविद्यालसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे राजेश टोपे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मेळघाट दौरा केलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सहा महिन्यांत कुपोषणाचा आकडा शून्य करणार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे यावर टोपे यांना प्रश्न विचारला असता, त्यावर टोपेंनी सावंत यांना फक्त शुभेच्छा देत बोलणे टाळले.

टॅग्स :PoliticsराजकारणRajesh Topeराजेश टोपेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस