शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 16:24 IST

विद्यमान सरकारने वैद्यकीय महाविद्यालसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे टोपे म्हणाले

अमरावती : देशभरात महागाई व बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच राज्यात होणारे मोठ-मोठे प्रकल्प हे गुजरातला पळविण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. परंतु राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार असून, रिमोट केंद्राकडे असल्याचा सूचक निशाणा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून साधला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी राजेश टोपे हे शहरात आले होते.

हिवाळी अधिवेशन हे १९ डिसेंबरपासून नागपूरला सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने राज्य सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी तसेच विदर्भाच्या विविध समस्या संदर्भात राष्ट्रवादीकडून महामोर्चा नागपूर अधिवेशनावर काढण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेतून टोपे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

टोपे म्हणाले, राज्यातील वेदांत सारखे मोठे प्रकल्प हे सरकारच्या नजरेसमोरून गुजरातला पळविण्यात आले. विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. पीक विमा कंपन्यांचे कार्यालय जिल्ह्यात नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेले प्रोत्साहन अनुदानही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची टीका राजेश टोपे यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रामाणिक प्रयत्न

अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्येही या प्रश्नावर चर्चा केली होती. विद्यमान सरकारने वैद्यकीय महाविद्यालसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे राजेश टोपे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मेळघाट दौरा केलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सहा महिन्यांत कुपोषणाचा आकडा शून्य करणार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे यावर टोपे यांना प्रश्न विचारला असता, त्यावर टोपेंनी सावंत यांना फक्त शुभेच्छा देत बोलणे टाळले.

टॅग्स :PoliticsराजकारणRajesh Topeराजेश टोपेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस