शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केले काऊंटडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 11:15 IST

गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे.

ठळक मुद्देमानव - वन्यजीव संघर्षाचे होणार विश्लेषणवनाधिकाऱ्यांना घटनेची द्यावी लागेल कारण मीमांसा

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात गत पाच वर्षात वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करतानाच दुसरीकडे वाघ, बिबट्याच्या शिकारीत वाढ झाली आहे. अशा घटनांचा आढावा घेण्यात येणार असून, वाघ, बिबट्याच्या हत्येची कारण मीमांसा शोधली जाणार आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी वन्यजीव विभागाची सूत्रे सांभाळल्यानंतर मानव - वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल, त्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यास प्रारंभ झाला आहे. गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. या काळात २५ पेक्षा जास्त वाघांच्या हल्ल्यात स्थानिक नागरिक मृत्यू झाले आहेत. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे.

सध्या चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात विद्युत प्रवाहाने १५ च्या वर वाघांचे बळी गेले आहेत. हे सत्र अद्यापही थांबले नाहीत. चंद्रपूर, गडचिरोलीत वाघांचे अस्तित्व असले तरी यवतमाळ, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वाघ आणि मान संघर्ष टोकाला जातो की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गत पाच वर्षात किती वाघ, बिबट ठार झाले. यात आरोपींची संख्या, पुढे याप्रकरणाचे न्यायालयात काय झाले?, याची माहिती संकलित केली जाणार आहे. याशिवाय वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.

वाघांचे स्थलांतरण वाढले

गत चार वर्षात वाघांचे स्थलांतरण वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ आता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात बिनदिक्कतपणे ये-जा करीत असल्याने याला संघर्षाची किनार लागली आहे. एरव्ही आपल्या हद्दीतून बाहेर न पडणारे वाघ अन्य जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे १५ वाघांनी अन्य जिल्ह्यात बस्तान मांडले आहे.

सौर कुंपणाचा आधार

वनक्षेत्रात वाघ, बिबट्याचे वास्तव आहे, अशा वनक्षेत्र लगतच्या शेतीला सौर कुंपणाची योजना मध्यंतरी वनविभागाने आणली. मात्र, त्यातील किचकट अटी मुळी ही योजना खुंटीला लटकली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र लगतच्या शेती शिवारात विहिरींना लोखंडी कठडे लावण्यावर मंथन झाले. मात्र, निधीची वाणवा असल्याने ही योजना रखडली आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण कुंपण योजनेला मान्यता देण्यास धजावत आहे. कारण या कुंपणामुळे वाघांचा संचार मार्ग बंद होण्याची भीती आहे.

व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे भम्रण मार्ग वाढले आहेत. स्थलांतरित वाघ प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात स्थिरावण्याची समस्या वाढली आहे. राखीव वनात वाघ असुरक्षित असल्याने आढावा घेण्यात येत आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणforest departmentवनविभाग