शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:13 IST

मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची खबरदारी घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.कोरोना या विषाणूचा मनुष्याला जेवढा धोका आहे, तेवढाच धोका वनातील प्रत्येक वन्यजीव व पाळीव जनावरांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा शिरकाव गावालगतच्या वनात होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. आर. गोपीनाथ यांनी ६ एप्रिल रोजी महत्त्वाचे पत्र राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना पाठविले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, वन्यजीव उद्यानात होणार नाही. याबाबत गांभीर्याने कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-१९ मुळे वाघ, बिबट व इतर वन्यजिवांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे वनातसुद्धा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आणि हा संसर्ग मानवापासून वन्यजिवांना होण्याची शक्यता वर्तविली आहे. वनालगत असलेली गावे वनापासून संरक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य असलेल्या भागात वनविभागाने पोलिसांप्रमाणे पहारा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, शिवाय ध्वनिप्रक्षेपणातून सूचना दिली जात आहे.मानवी संपर्क रोखाकोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी शहर, गावागावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. वनक्षेत्रानजीकच्या खेड्यांवर बारीक लक्ष ठेवून वनालगतचे नागरिक वनात शिरकाव करणार नाहीत, यासाठी स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवावे आणि योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून मानवाचा वनाशी असलेला संपर्क तुटला पाहिजे, अशी भूमिका राहणार आहे. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात अपप्रवेश करणाºयास अटक करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची शक्यता आहे.वन्यजीव बाधित झाल्यासमानवी हस्तक्षेपामुळे एखाद्या वन्यजिवास कोरोनाची लागण झाल्यास त्या ठिकाणी वनविभागाचे स्पेशल फोर्स, पशुवैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी, वनाधिकारी यांनी त्वरीत कृती करून अशा संकटाशी दोन हात करावे व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्कालीन सेवा म्हणून वन्यजिवास कोरोनाची लागण दिसून आल्यास सॅम्पल संसर्ग विभागास पाठविण्याची कामे करावी लागेल, यासाठी आरोग्य विभागाची मदत मिळणार आहे. वन्यजिवांनासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने वनविभाग अलर्ट आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस