शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:13 IST

मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची खबरदारी घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.कोरोना या विषाणूचा मनुष्याला जेवढा धोका आहे, तेवढाच धोका वनातील प्रत्येक वन्यजीव व पाळीव जनावरांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा शिरकाव गावालगतच्या वनात होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. आर. गोपीनाथ यांनी ६ एप्रिल रोजी महत्त्वाचे पत्र राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना पाठविले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, वन्यजीव उद्यानात होणार नाही. याबाबत गांभीर्याने कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-१९ मुळे वाघ, बिबट व इतर वन्यजिवांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे वनातसुद्धा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आणि हा संसर्ग मानवापासून वन्यजिवांना होण्याची शक्यता वर्तविली आहे. वनालगत असलेली गावे वनापासून संरक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य असलेल्या भागात वनविभागाने पोलिसांप्रमाणे पहारा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, शिवाय ध्वनिप्रक्षेपणातून सूचना दिली जात आहे.मानवी संपर्क रोखाकोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी शहर, गावागावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. वनक्षेत्रानजीकच्या खेड्यांवर बारीक लक्ष ठेवून वनालगतचे नागरिक वनात शिरकाव करणार नाहीत, यासाठी स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवावे आणि योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून मानवाचा वनाशी असलेला संपर्क तुटला पाहिजे, अशी भूमिका राहणार आहे. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात अपप्रवेश करणाºयास अटक करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची शक्यता आहे.वन्यजीव बाधित झाल्यासमानवी हस्तक्षेपामुळे एखाद्या वन्यजिवास कोरोनाची लागण झाल्यास त्या ठिकाणी वनविभागाचे स्पेशल फोर्स, पशुवैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी, वनाधिकारी यांनी त्वरीत कृती करून अशा संकटाशी दोन हात करावे व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्कालीन सेवा म्हणून वन्यजिवास कोरोनाची लागण दिसून आल्यास सॅम्पल संसर्ग विभागास पाठविण्याची कामे करावी लागेल, यासाठी आरोग्य विभागाची मदत मिळणार आहे. वन्यजिवांनासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने वनविभाग अलर्ट आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस