शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:13 IST

मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची खबरदारी घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.कोरोना या विषाणूचा मनुष्याला जेवढा धोका आहे, तेवढाच धोका वनातील प्रत्येक वन्यजीव व पाळीव जनावरांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा शिरकाव गावालगतच्या वनात होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. आर. गोपीनाथ यांनी ६ एप्रिल रोजी महत्त्वाचे पत्र राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना पाठविले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, वन्यजीव उद्यानात होणार नाही. याबाबत गांभीर्याने कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-१९ मुळे वाघ, बिबट व इतर वन्यजिवांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे वनातसुद्धा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आणि हा संसर्ग मानवापासून वन्यजिवांना होण्याची शक्यता वर्तविली आहे. वनालगत असलेली गावे वनापासून संरक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य असलेल्या भागात वनविभागाने पोलिसांप्रमाणे पहारा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, शिवाय ध्वनिप्रक्षेपणातून सूचना दिली जात आहे.मानवी संपर्क रोखाकोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी शहर, गावागावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. वनक्षेत्रानजीकच्या खेड्यांवर बारीक लक्ष ठेवून वनालगतचे नागरिक वनात शिरकाव करणार नाहीत, यासाठी स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवावे आणि योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून मानवाचा वनाशी असलेला संपर्क तुटला पाहिजे, अशी भूमिका राहणार आहे. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात अपप्रवेश करणाºयास अटक करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची शक्यता आहे.वन्यजीव बाधित झाल्यासमानवी हस्तक्षेपामुळे एखाद्या वन्यजिवास कोरोनाची लागण झाल्यास त्या ठिकाणी वनविभागाचे स्पेशल फोर्स, पशुवैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी, वनाधिकारी यांनी त्वरीत कृती करून अशा संकटाशी दोन हात करावे व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्कालीन सेवा म्हणून वन्यजिवास कोरोनाची लागण दिसून आल्यास सॅम्पल संसर्ग विभागास पाठविण्याची कामे करावी लागेल, यासाठी आरोग्य विभागाची मदत मिळणार आहे. वन्यजिवांनासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने वनविभाग अलर्ट आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस