‘फ्लॅटस् की मृत्यूचे पिंजरे
By Admin | Updated: May 24, 2014 23:13 IST2014-05-24T23:13:07+5:302014-05-24T23:13:07+5:30
फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेकडे केवळ ‘घटना’म्हणून बघता येणार नाही आणि विसरताही येणार नाही.

‘फ्लॅटस् की मृत्यूचे पिंजरे
फ्लॅटची संख्या वाढली : पार्किंग,वीज,लिफ्ट शेजारी असणे धोक्याचे वैभव बाबरेकर - अमरावती फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेकडे केवळ शहराचा विस्तार वाढू लागला आणि जागेची कमतरता भासू लागली. त्यावर पर्याय म्हणून फ्लॅट सिस्टिमचा उदय झाला. मजल्यावर मजले बांधून निवासाचा प्रश्न सुटल्याने यात बिल्डर्सचा तर फायदा झाला आणि नागरिकांचीही निवासाची समस्या सुटली. परंतु निवासस्थानांची समस्या सोडवीत असतानाच या फ्लॅट सिस्टीममध्ये राहणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागला आहे. कमी जागेत बांधलेल्या फ्लॅट सिस्टिममध्ये वीज, पाणी, पार्किंगची व्यवस्था अगदी एकमेकांना लागूनच असते. त्यामुळे अपघात घडल्यास सर्वच गोष्टींचे नुकसान होते. यापूर्वीही अनेकदा या घटना घडल्या आहेत. नागपुरात शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे तर समाजमन हेलावून गेले. नागपूरच्या अजिंक्य प्लाझा अपार्टमेंटमध्ये लिफ्टजवळच विद्युत मीटर व पार्किंगची व्यवस्था असल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भाची उपराजधानी असलेल्या अमरावती शहरातही बहुतांश अपार्टमेंटमध्ये अशीच व्यवस्था आहे.