शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

धामणगाव तालुक्यातील पाच गावे काळोखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:18 AM

साप विंचवाची वाढली भीती प्यावे लागतात दूषित पाणी धामणगाव रेल्वे : तालुक्यात अधिक पावसामुळे पाच गावांतील विद्युत ...

साप विंचवाची वाढली भीती

प्यावे लागतात दूषित पाणी

धामणगाव रेल्वे : तालुक्यात अधिक पावसामुळे पाच गावांतील विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. महावितरणची सेवा कोलमडली आहे. यादरम्यान रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती अधिक वाढली आहे.

तालुक्यातील वाढोणा, घुसळी, कामनापूर, काशीखेड, मलातपूर, महिमापूर या गावांत अधिक पाऊस झाला. यादरम्यान दोन दिवसांपासून कमी-अधिक पावसाची दररोज हजेरी लागत आहे. पाच दिवसांपासून या गावातील वीजपुरवठा खंडित आहे. दिवसभर शेतकरी शेतात काम करतात, मात्र रात्रीला विद्युत पुरवठा राहत नाही. त्यामुळे धान्य दळून आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या भागात अनेकांची घरे कच्च्या माती-विटांची असल्याने रात्रीला साप-विंचू निघतात. विद्युत पुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. महावितरणने आता तरी ग्रामीण भागाचा अंत पाहू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन घुसळीकर, सरपंच राजू बांते, उपसरपंच सुभाष डबले, चंद्रशेखर कडू, रवींद्र पणपलिया यांनी महावितरणला निवेदन दिले. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता यू.के. राठोड यांनी दिले.