शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गृह खात्याला कोरोना पॅरोलचा विसर; पाच हजार कैदी बाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 11:37 IST

यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत नोटिफिकेशन जारी होईल, अशी माहिती गृह विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देखून, बलात्कार यासह प्रसिद्ध खटल्यातील कैद्यांचा समावेश

गणेश वासनिक

अमरावती : हल्ली कोरोना संक्रमितांची संख्या ओसरली असून, कोविड रुग्णालयेसुद्धा ओस पडली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोविड आपत्ती व्यवस्थापन कायद्याबाबतचे निर्बंध शिथिल करून ‘मिशन बिगेन’ अंतर्गत सर्व काही सुरू केले. मात्र, गत दोन वर्षांपूर्वी अटी, शर्तींच्या अधीन आणि नियमांचे पालन करून कैद्यांना कोरोना आकस्मिक पॅरोलवर सोडण्यात आले. या कैद्यांना कारागृहात परत आणण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने नोटिफिकेशन जारी केले नाही. परिणामी पाच हजार कैदी कारागृहाबाहेर असल्याची माहिती आहे.

राज्य शासनाने ३० मार्च २०२२ रोजी महाराष्ट्रातून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार बाजारपेठ, व्यवसाय, वाहतूक, रेल्वे यासह सर्व काही आलबेल असल्याची स्थिती आहे. परंतु, खून, बलात्कार यासह प्रसिद्ध खटल्यातील कैदी कोरोना आकस्मिक पॅरोलवर बाहेर आहेत. आता कारागृहांमध्ये कोरोना लसीकरण आटोपले. संक्रमित संख्या नाही, कायदे आणि न्यायालयाने या कैद्यांना आरोपी ठरविले आहे. हे कैदी समाजात वावरत असल्यास शांतताभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत नोटिफिकेशन जारी होईल, अशी माहिती गृह विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

पॅरोलवरील कैद्यांच्या पोलिसांत नोंदी गायब?

राज्य शासनाच्या गृह विभागाचे उपसचिव एन. एस. कराड यांच्या स्वाक्षरीने ८ मे २०२० रोजी राजपत्र जारी करून कैद्यांना अटी, शर्तींच्या आधारे पॅरोलवर सोडण्याचे आदेश होते. मध्यवर्ती, जिल्हा, महिला, विशेष आणि खुल्या कारागृहातून कोरोनाकाळात कैदी बाहेर सोडण्यात आले. मात्र, या कैद्यांना पॅरोलवर सोडताना घरीच राहणे आणि संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी अनिवार्य केली होती. मात्र, किती कैद्यांच्या ‘हिस्ट्री’ची पोलिसांत नोंद आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

कारागृहांच्या कामकाजावर परिणाम

कारागृहात सात वर्षे शिक्षा झालेले कैदी पॅरोलच्या सुटीवर गेले आहेत. हल्ली कारागृहात कैद्यांची संख्या कमी झाल्याने शेतीकामे, कारखाने ओस पडले आहेत. त्यामुळे कारागृहांच्या उत्पन्नावरही बराच परिणाम जाणवत आहे. कोरोना इमर्जन्सी पॅरोलचा कालावधी ४५ दिवसांचा निश्चित होता; परंतु राज्य शासनाने कारागृहात पॅरोलवरील कैद्यांबाबत निर्णय घेतला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगGovernmentसरकारPrisonतुरुंग