शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उन्नत भारत अभियानाचे अमरावती विद्यापीठात पहिले केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:11 IST

विदर्भातील विद्यापीठे, संस्था एकत्रित येणार; शिक्षणातील सामाजिक चळवळ उभारणार 

अमरावती : केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे देशातील पहिले विभागीय समन्वयक संस्था (आयसीआय) म्हणून संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातील विद्यापीठे, सामाजिक संस्था एकत्रित येऊन शिक्षणातील सामाजिक चळवळ उभी करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयाकडून ‘आरसीआय’ हे केंद्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाल्याने ते नोडल म्हणून कामकाज हाताळणार आहेत. विदर्भातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे केंद्र कार्यरत असेल. शहराचा विकास झाला, त्या तुलनेत ग्रामविकास व्हावा. शिक्षण आणि समाज या  एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.

विद्यापीठ हे शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून, या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या ‘थीम’वर आधारित उन्नत भारत अभियान आणि उन्नत महाराष्ट्र अभियान योजनेने ग्रामीण भागातील अनंत अडचणी सोडविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कृषी क्षेत्राला बळकटी, कर्जबळीमुळे शेतकरी आत्महत्या रोखणे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शेतीपूरक पशुपालन, मत्स्य व्यवसाय, गोपालन, कुकुटपालन, वनौषधी आदींवर स्वंयरोजगाराला चालना दिली जाणार आहे. 

विदर्भातून या विद्यापीठाचा सहभाग

उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी विदर्भातील सर्वच विद्यापीठे एकित्रत आली आहेत. यात अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. विद्यापीठाचा सहभाग असणार आहे.

उन्नत भारत केंद्रातून शिक्षणातून ग्रामविकास, कॉलेज टू व्हिलेज, ग्राम दत्तक योजना राबविली जाणार आहे. शिक्षणाला सामाजिक चळवळ बनविण्यासाठी अविरतपणे कार्य के ले जाणार आहे. ग्रामविकास हीच स्वप्नपूर्ती असणार आहे असं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ