शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

उन्नत भारत अभियानाचे अमरावती विद्यापीठात पहिले केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:11 IST

विदर्भातील विद्यापीठे, संस्था एकत्रित येणार; शिक्षणातील सामाजिक चळवळ उभारणार 

अमरावती : केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे देशातील पहिले विभागीय समन्वयक संस्था (आयसीआय) म्हणून संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातील विद्यापीठे, सामाजिक संस्था एकत्रित येऊन शिक्षणातील सामाजिक चळवळ उभी करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयाकडून ‘आरसीआय’ हे केंद्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाल्याने ते नोडल म्हणून कामकाज हाताळणार आहेत. विदर्भातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे केंद्र कार्यरत असेल. शहराचा विकास झाला, त्या तुलनेत ग्रामविकास व्हावा. शिक्षण आणि समाज या  एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.

विद्यापीठ हे शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून, या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या ‘थीम’वर आधारित उन्नत भारत अभियान आणि उन्नत महाराष्ट्र अभियान योजनेने ग्रामीण भागातील अनंत अडचणी सोडविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कृषी क्षेत्राला बळकटी, कर्जबळीमुळे शेतकरी आत्महत्या रोखणे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शेतीपूरक पशुपालन, मत्स्य व्यवसाय, गोपालन, कुकुटपालन, वनौषधी आदींवर स्वंयरोजगाराला चालना दिली जाणार आहे. 

विदर्भातून या विद्यापीठाचा सहभाग

उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी विदर्भातील सर्वच विद्यापीठे एकित्रत आली आहेत. यात अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. विद्यापीठाचा सहभाग असणार आहे.

उन्नत भारत केंद्रातून शिक्षणातून ग्रामविकास, कॉलेज टू व्हिलेज, ग्राम दत्तक योजना राबविली जाणार आहे. शिक्षणाला सामाजिक चळवळ बनविण्यासाठी अविरतपणे कार्य के ले जाणार आहे. ग्रामविकास हीच स्वप्नपूर्ती असणार आहे असं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ