शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत भारत अभियानाचे अमरावती विद्यापीठात पहिले केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:11 IST

विदर्भातील विद्यापीठे, संस्था एकत्रित येणार; शिक्षणातील सामाजिक चळवळ उभारणार 

अमरावती : केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाचे देशातील पहिले विभागीय समन्वयक संस्था (आयसीआय) म्हणून संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विदर्भातील विद्यापीठे, सामाजिक संस्था एकत्रित येऊन शिक्षणातील सामाजिक चळवळ उभी करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयाकडून ‘आरसीआय’ हे केंद्र अमरावती विद्यापीठाला प्राप्त झाल्याने ते नोडल म्हणून कामकाज हाताळणार आहेत. विदर्भातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे केंद्र कार्यरत असेल. शहराचा विकास झाला, त्या तुलनेत ग्रामविकास व्हावा. शिक्षण आणि समाज या  एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे.

विद्यापीठ हे शिक्षण देणारे ज्ञानकेंद्र असून, या माध्यमातून समाज शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या ‘थीम’वर आधारित उन्नत भारत अभियान आणि उन्नत महाराष्ट्र अभियान योजनेने ग्रामीण भागातील अनंत अडचणी सोडविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कृषी क्षेत्राला बळकटी, कर्जबळीमुळे शेतकरी आत्महत्या रोखणे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शेतीपूरक पशुपालन, मत्स्य व्यवसाय, गोपालन, कुकुटपालन, वनौषधी आदींवर स्वंयरोजगाराला चालना दिली जाणार आहे. 

विदर्भातून या विद्यापीठाचा सहभाग

उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी विदर्भातील सर्वच विद्यापीठे एकित्रत आली आहेत. यात अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. विद्यापीठाचा सहभाग असणार आहे.

उन्नत भारत केंद्रातून शिक्षणातून ग्रामविकास, कॉलेज टू व्हिलेज, ग्राम दत्तक योजना राबविली जाणार आहे. शिक्षणाला सामाजिक चळवळ बनविण्यासाठी अविरतपणे कार्य के ले जाणार आहे. ग्रामविकास हीच स्वप्नपूर्ती असणार आहे असं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ