शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:44 IST

धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता.

ठळक मुद्देअडीच किलोमीटरवरील परिसर खाक : सहा तासांनंतर आग नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. अग्निशमन जवान व नागरिकांनी शर्थ करून आग विझविली. आ. यशोमती ठाकूर यांनी स्वत: नागरिकांना आग विझविण्यासाठी सहकार्य केले.वणी गावालगत अज्ञात इसमाने शेताच्या बांधावर आग लावली होती. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आगीमुळे रवींद्र टेकाडे व राजेंद्र टेकाडे यांच्या संत्राबागा जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की, बघता बघता जंगलापासून अडीच किलोमीटर परिसर जळाल्यानंतर गावापर्यंत ती पसरत आली होती. घटनेची माहिती मिळताच पाच अग्निशामक बंबांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच खुद्द आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनीही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. सहा तासांनंतर आग नियंत्रणात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार दत्ता पंढरे, पोलीस निरीक्षक अजय आकरे, पीएसआय आशिष बोरकरसह पोलीस, महसूल व महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते.लोकप्रतिनिधींनीही घेतले परिश्रमआमदार यशोमती ठाकूर यांच्यासह भाजप नेत्या निवेदित चौधरी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विलास माहुरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, वणीचे सरपंच मुकुंद पुनसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, विनोद कडगे, सागर खांडेकर आदी लोकप्रतिनिधींनी आग लागल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांना आग विझविण्यात सहकार्य केले. आ. ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेऊन पाण्याची बकेट व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.गावांनाही वेढाआग रौद्र रूप धारण करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या गावांपर्यंत पसरली. यात दोन संत्राबागा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावापर्यंत आग पसरल्याने नागरिकांनी घराबाहेर निघून पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पाच बंबांनी विझविली आगवर्धा जिल्ह्यातील आष्टी, आर्वी व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती येथील पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेची दाखल झाल्या होत्या. तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली.

टॅग्स :fireआग