शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:44 IST

धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता.

ठळक मुद्देअडीच किलोमीटरवरील परिसर खाक : सहा तासांनंतर आग नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. अग्निशमन जवान व नागरिकांनी शर्थ करून आग विझविली. आ. यशोमती ठाकूर यांनी स्वत: नागरिकांना आग विझविण्यासाठी सहकार्य केले.वणी गावालगत अज्ञात इसमाने शेताच्या बांधावर आग लावली होती. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आगीमुळे रवींद्र टेकाडे व राजेंद्र टेकाडे यांच्या संत्राबागा जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की, बघता बघता जंगलापासून अडीच किलोमीटर परिसर जळाल्यानंतर गावापर्यंत ती पसरत आली होती. घटनेची माहिती मिळताच पाच अग्निशामक बंबांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच खुद्द आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनीही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. सहा तासांनंतर आग नियंत्रणात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार दत्ता पंढरे, पोलीस निरीक्षक अजय आकरे, पीएसआय आशिष बोरकरसह पोलीस, महसूल व महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते.लोकप्रतिनिधींनीही घेतले परिश्रमआमदार यशोमती ठाकूर यांच्यासह भाजप नेत्या निवेदित चौधरी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विलास माहुरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, वणीचे सरपंच मुकुंद पुनसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, विनोद कडगे, सागर खांडेकर आदी लोकप्रतिनिधींनी आग लागल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांना आग विझविण्यात सहकार्य केले. आ. ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेऊन पाण्याची बकेट व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.गावांनाही वेढाआग रौद्र रूप धारण करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या गावांपर्यंत पसरली. यात दोन संत्राबागा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावापर्यंत आग पसरल्याने नागरिकांनी घराबाहेर निघून पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पाच बंबांनी विझविली आगवर्धा जिल्ह्यातील आष्टी, आर्वी व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती येथील पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेची दाखल झाल्या होत्या. तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली.

टॅग्स :fireआग