शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:44 IST

धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता.

ठळक मुद्देअडीच किलोमीटरवरील परिसर खाक : सहा तासांनंतर आग नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. अग्निशमन जवान व नागरिकांनी शर्थ करून आग विझविली. आ. यशोमती ठाकूर यांनी स्वत: नागरिकांना आग विझविण्यासाठी सहकार्य केले.वणी गावालगत अज्ञात इसमाने शेताच्या बांधावर आग लावली होती. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आगीमुळे रवींद्र टेकाडे व राजेंद्र टेकाडे यांच्या संत्राबागा जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की, बघता बघता जंगलापासून अडीच किलोमीटर परिसर जळाल्यानंतर गावापर्यंत ती पसरत आली होती. घटनेची माहिती मिळताच पाच अग्निशामक बंबांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच खुद्द आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनीही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. सहा तासांनंतर आग नियंत्रणात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार दत्ता पंढरे, पोलीस निरीक्षक अजय आकरे, पीएसआय आशिष बोरकरसह पोलीस, महसूल व महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते.लोकप्रतिनिधींनीही घेतले परिश्रमआमदार यशोमती ठाकूर यांच्यासह भाजप नेत्या निवेदित चौधरी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विलास माहुरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, वणीचे सरपंच मुकुंद पुनसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, विनोद कडगे, सागर खांडेकर आदी लोकप्रतिनिधींनी आग लागल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांना आग विझविण्यात सहकार्य केले. आ. ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेऊन पाण्याची बकेट व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.गावांनाही वेढाआग रौद्र रूप धारण करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या गावांपर्यंत पसरली. यात दोन संत्राबागा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावापर्यंत आग पसरल्याने नागरिकांनी घराबाहेर निघून पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पाच बंबांनी विझविली आगवर्धा जिल्ह्यातील आष्टी, आर्वी व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती येथील पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेची दाखल झाल्या होत्या. तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली.

टॅग्स :fireआग