शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अखेर जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:57 AM

पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली.

ठळक मुद्देनवा स्रोत शोधला । प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिनी मंत्रालयातील पाणीटंचाई दूर होणार आहे.सध्या दुष्काळ व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टंचाई असल्यामुळे जिल्हाभरातील ४३ गावांत ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर २४९ गावांत २७६ विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे. अशातच पाणीटंचाईची झळ ही जिल्हा परिषदेत पोहोचली होती. परिणामी ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने नवीन बोअर केले. मात्र, या बोअरला पाण्याचा पुरेसा स्रोत न मिळाल्याने परिस्थिती कायम होती. काही दिवसांपासून झेडपी अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबत वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागल्याचे वास्तव आहे. पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कूलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे.झेडपीचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी पाण्याची समस्या होती. त्यावर पर्यायी व्यवस्था केली. मात्र, ती यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा नव्या पाणी स्रोताचा शोध घेऊन बोअर करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला.- नारायन सानप,डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन

टॅग्स :water shortageपाणीटंचाई