शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अखेर प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशाला मुदतवाढ,  अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:59 IST

 इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयांत प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रवेश घेता येईल, याबाबतची अधिसूचना गुरूवारी निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती, दि. 14 - इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयांत प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रवेश घेता येईल, याबाबतची अधिसूचना गुरूवारी निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ७ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर ही होती. इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही महाविद्यालयात प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित असल्याने महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाने प्रथमवर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान, समाजविज्ञान आदी शाखांमधील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. नव्या निर्णयामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३७५ महाविद्यालयांमध्ये प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

‘‘यापूर्वी प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर होती. मात्र, इयत्ता १२ वीचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थी प्रथमवर्ष अभ्यासक्रमापासून वंचित राहू नये, यासाठी प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.- ए.डी.चव्हाण,उपकुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग.

प्रवेशासंदर्भात प्राचार्यांना पत्र...प्रथमवर्ष अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश द्यावा, याबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आल्यास ते बिनशर्त स्वीकारावे, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी