शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अखेर अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस रेल्वे पुन्हा पूर्ववत धावणार!

By गणेश वासनिक | Updated: October 4, 2022 20:11 IST

दसऱ्यानिमित्त खासदारांची जनतेला अनोखी भेट, रेल्वे मंत्र्यांकडून मान्यतापत्रही मिळाले

अमरावती : कोरोना काळात काही तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/ ६०) ही रेल्वेगाडी पुन्हा धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली असून, तसे पत्र खासदार नवनीत राणा यांना प्राप्त झाले आहे. हा निर्णय म्हणजे जिल्हावासीयांना दसऱ्यानिमित्य अनोखी भेट मानली जात आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जबलपूर एक्सप्रेसला नागपूर येथून अमरावतीपर्यंत पुढे नेण्याची मान्यता दिली आहे.

ही रेल्वेगाडी नागपूर ते जबलपूर या दरम्यान सुरू होती. मात्र, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात ही रेल्वेगाडी अमरावती-जबलपूर अशी मंजूर झाली होती. ती अशीच बरेच वर्ष अमरावती- जबलपूर या दरम्यान सुरू राहिली. मात्र, कोरोना काळात अमरावतीपर्यंत धावण्यास ब्रेक लावला गेला. परंतु, या रेल्वेगाडीची मोठी डिमांड असल्याने पुन्हा सुरू करण्याची मागणी झाली. त्याकरिता खासदार राणांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाशी संपर्क ठेवला आणि पुन्हा अमरावती -जबलपूर एक्सप्रेस पूर्ववत धावणार असल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मानला जात आहे. ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी नुकतेच कॉंग्रेसने अमरावती रेल्वे स्थानकावर आंदोलन सुद्धा केले होते.

अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्यांना दळवळणाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या प्रवाससुविधेत भर पडणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मागणी मान्य करून जिल्हावासीयांना न्याय दिला आहे, अशा भावना खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे