शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

भीषण आग, पाच घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला.

ठळक मुद्देमुऱ्हादेवी येथील घटना : गोठ्यात बांधलेली पाच जनावरेही मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील मुऱ्हादेवी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच घरे जळून खाक झाली. गोठ्यात बांधलेले तीन बैल, एक म्हैस, बोकडाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही भीषण आग आटोक्यात आणण्याकरिता दर्यापूर, आकोट, अचलपूरहून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.उन्हाचा पारा वाढताच अंजनगाव तालुक्यात आगीचा प्रकोप वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी निमखेड बाजार येथे भीषण आगीत मोठे नुकसान झाले.बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला. एक म्हैस आणि एक बोकडसुद्धा दगावला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी सलीम यांनी ७५ हजारांचीबैलजोडी आणि ६० हजारांची म्हैस घरातील सर्व पुंजी खर्चून आणली होती. गोठ्याला आग लागल्यानंतर जनावरांना सोडण्यास गेलेल्या अ. सलीमदेखील भाजले गेले. शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजार जळाल्याने मोठे नुकसान झाले. अतुल पखान यांचे शेतीपयोगी अवजार जळाले. आग आटोक्यात आणण्याकरिता ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा केला. मात्र, आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती.अग्निशमन वाहन नादुरुस्तअंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने दर्यापूर, अचलपूर, अकोट येथील बंब बोलावण्यात आले. यानंतर आग आटोक्यात आली. वृत्त लिहिस्तोवर महसूल प्रशासन घटनास्थळाचा पंचनामा करीत होते. तहसीलदार विश्वनाथ घुगे, चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार जमील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.दर्यापूरला फोन कराअंजनगाव नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बुधवारीही कुचकामी ठरले. आमचे वाहन नादुरुस्त आहे. दर्यापूरला फोन करा, असा सल्ला ग्रामस्थांना मिळाला. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नसल्याने आमदारांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी चर्चा आहे.

टॅग्स :fireआग