शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

मरणाच्या भीतीने गिरगुटीत एकानेच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST

०७एएमपीएच२० - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे (((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((( मेळघाटात अफवा, उर्वरित जिल्ह्यातून आले अन् लसीकरण ...

०७एएमपीएच२० - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे

((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((((

मेळघाटात अफवा, उर्वरित जिल्ह्यातून आले अन् लसीकरण करून निघून गेले

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिरात नव्वद जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी गावातील एकमेव व्यक्तीने महत्प्रयासाने लस घेतली. उर्वरित ८९ नागरिक वरूड, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर आदी भागातून येऊन लस घेऊन निघून गेले. देशभर कोरोना लसीसाठी मारामार सुरू असताना, मेळघाटात मात्र लस घेतल्याने माणसाचा मृत्यू होतो, ही अफवा मागील चार दिवसांपासून दोनशेपेक्षा अधिक गावांत पसरली. यामुळे आदिवासींनी लस टोचून घेणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.आंबापाटी गावातील काही नागरिकांनी पसरविलेली मृत्यूची अफवा मेळघाटच्या दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचली. यामुळे आदिवासी कोरोनाची लस घेण्यास तयार नाहीत. हा गैरसमज निघून जावा, यासाठी या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिर आयोजित केले. आरोग्य विभागाने त्याची तयारीही केली. मंडप टाकण्यात आला. परंतु, दोन तास झाले तरीही एकही आदिवासी लस घ्यायला तयारच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी संवाद साधून कारण शोधले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. लस घेतल्याने माणूस मरतो. त्यामुळे आम्ही लस घेत नसल्याचे आदिवासींनी त्यांनी सांगितले.बॉक्सअथक प्रयत्नानंतर एकानेच घेतली लस, ८९ आले तालुक्याबाहेरीलगिरगुटी गावात मंगळवारी एकूण ९० जणांनी लस घेतल्याची नोंद झाली. प्रत्यक्षात त्या गावातील एकच आदिवासीने ही लस घेतली, तर उर्वरित अचलपूर, परतवाडा, वरूड, अंजनगाव अशा तालुक्याबाहेरील लोकांनी ऑनलाईन नोंदणी करून आदिवासी पाड्यात जाऊन लस घेतली.बॉक्सजनजागृती मोहीम आवश्यकमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १६ हून अधिक गावे ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. दुसरीकडे आदिवासी लस घ्यायला तयार नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत कोरोना लसीसंदर्भात जनजागरण मोहीम करणे गरजेचे ठरले आहे.कोटलस घेतल्याने माणूस मरतो, अशी अफवा मेळघाटात पसरली आहे. गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरणात गावातील एकमेव लाभार्थी होता.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदराकोटगिरगुटीत गावातील नागरिकांना कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. परंतु, अथक प्रयत्नानंतर केवळ एकानेच लस घेतली. प्रत्येक गावात आता जिल्हा परिषद मार्फत जनजागृती मोहीम सुरु करीत आहोत. अफवांथा थारा देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.- दयाराम काळे, समाजकल्याण सभापतीजि प अमरावती