शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

नवरात्रीचा उपवास करताय! फळे खा, शाबूदाणा टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 17:11 IST

नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा.

ठळक मुद्देआहारतज्ज्ञांचा सल्ला : शरीराला पचेल असे पदार्थ खावे

अमरावती : नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाची प्रथा आजही बहुतांश महिला, पुरुष पाळतात. अंबानगरीत जागृत अंबादेवीचे ठाण असल्याने नित्यनेमाने पहाटे पूजाअर्चा भाविक करतात. मात्र, उपवासात फळांचा आहार शरीराला साजेसा राहणार असल्याने शाबूदाना टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

अंबापुरी, अंबानगरी असे संबोधले जाणाऱ्या अमरावती शहरात जागृत अंबा, एकवीरादेवीचे मंदिर असल्याने नवरात्रोत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. विदर्भातील नागरिकांचे कुळदैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनाकरिता अत्यंत व्यस्त असलेले भाविक नवरात्रात आवर्जून येतात. त्यानिमित्ताने येथील यात्रेतून आठवण म्हणून खरेदी करतात. ही परंपरा आजही प्रचलित आहे.

दरम्यान, गाढ श्रद्धा असलेले भाविक नऊही दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. अनेकजण नऊ दिवस विना पादत्राने ठिकठिकाणी फरतात. मात्र, उपवासात शाबूदान्याचा वापर केल्यास ते पचायला जड जाते. त्यामुळे कमी खाणे, तेही पचनास सुकर असलेली फळे, भगर आदींचा वापर केल्यास शारीरिक व्याधी वाढण्यापासून रोखता येऊ शकते, असे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख यांनी सांगितले.

हे पदार्थ खाल्लेले बरे

उपवासात फळ, भाज्या व फळांचा रस सेवन करावे. शाबूदाणा खीर, भगर खीर यातून प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळते. आतील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे, असे आहारतज्ज्ञ रसिका राजनेकर यांनी सांगितले.

शाबूदाणा खाल्ल्याने काय त्रास होऊ शकतो?

शाबूदाणा हे अनेक प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे त्यापासून बनिवलेले विविध पदार्थ खान्यास बरे वाटत असले तरी ते पचनास त्रासदायक ठरतात. मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींना तो पचवताना जड जातो. पोट साफ होत नसल्याने व्याधी जडतात, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शरीर थकेल अशी कामे टाळावी

नवरात्राच्या या नऊ दिवसात उपवास करीत असल्याने नेहमीप्रमाणे काम करू नये. शरीत तेवढी कामे करण्याची ऊर्जा निर्माण होत नसल्याने थकवा येऊ शकतो. शरीर अस्वस्थामुळे भोवळ येणे, रक्तदाब कमी-अधिक होण्याचा प्रकार घडू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उपवासात शाबुदाणा खीर, भगर खीर, मिक्स सुकामेवा शेक, चिक्कीचे पदार्थ ड्रायफ्रुट, शेंगदाणा, राजगिरा, मखाना, भगर इडली, पनीर ग्रेव्ही, नारळ पाणी, शिंगाडा अप्पे यातून प्रोटीन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट मिळते. हे पदार्थ उपवासात खावे.

- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स