शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीचा उपवास करताय! फळे खा, शाबूदाणा टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 17:11 IST

नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा.

ठळक मुद्देआहारतज्ज्ञांचा सल्ला : शरीराला पचेल असे पदार्थ खावे

अमरावती : नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाची प्रथा आजही बहुतांश महिला, पुरुष पाळतात. अंबानगरीत जागृत अंबादेवीचे ठाण असल्याने नित्यनेमाने पहाटे पूजाअर्चा भाविक करतात. मात्र, उपवासात फळांचा आहार शरीराला साजेसा राहणार असल्याने शाबूदाना टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

अंबापुरी, अंबानगरी असे संबोधले जाणाऱ्या अमरावती शहरात जागृत अंबा, एकवीरादेवीचे मंदिर असल्याने नवरात्रोत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. विदर्भातील नागरिकांचे कुळदैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनाकरिता अत्यंत व्यस्त असलेले भाविक नवरात्रात आवर्जून येतात. त्यानिमित्ताने येथील यात्रेतून आठवण म्हणून खरेदी करतात. ही परंपरा आजही प्रचलित आहे.

दरम्यान, गाढ श्रद्धा असलेले भाविक नऊही दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. अनेकजण नऊ दिवस विना पादत्राने ठिकठिकाणी फरतात. मात्र, उपवासात शाबूदान्याचा वापर केल्यास ते पचायला जड जाते. त्यामुळे कमी खाणे, तेही पचनास सुकर असलेली फळे, भगर आदींचा वापर केल्यास शारीरिक व्याधी वाढण्यापासून रोखता येऊ शकते, असे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख यांनी सांगितले.

हे पदार्थ खाल्लेले बरे

उपवासात फळ, भाज्या व फळांचा रस सेवन करावे. शाबूदाणा खीर, भगर खीर यातून प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळते. आतील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे, असे आहारतज्ज्ञ रसिका राजनेकर यांनी सांगितले.

शाबूदाणा खाल्ल्याने काय त्रास होऊ शकतो?

शाबूदाणा हे अनेक प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे त्यापासून बनिवलेले विविध पदार्थ खान्यास बरे वाटत असले तरी ते पचनास त्रासदायक ठरतात. मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींना तो पचवताना जड जातो. पोट साफ होत नसल्याने व्याधी जडतात, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शरीर थकेल अशी कामे टाळावी

नवरात्राच्या या नऊ दिवसात उपवास करीत असल्याने नेहमीप्रमाणे काम करू नये. शरीत तेवढी कामे करण्याची ऊर्जा निर्माण होत नसल्याने थकवा येऊ शकतो. शरीर अस्वस्थामुळे भोवळ येणे, रक्तदाब कमी-अधिक होण्याचा प्रकार घडू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उपवासात शाबुदाणा खीर, भगर खीर, मिक्स सुकामेवा शेक, चिक्कीचे पदार्थ ड्रायफ्रुट, शेंगदाणा, राजगिरा, मखाना, भगर इडली, पनीर ग्रेव्ही, नारळ पाणी, शिंगाडा अप्पे यातून प्रोटीन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट मिळते. हे पदार्थ उपवासात खावे.

- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स