शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

नवरात्रीचा उपवास करताय! फळे खा, शाबूदाणा टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 17:11 IST

नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा.

ठळक मुद्देआहारतज्ज्ञांचा सल्ला : शरीराला पचेल असे पदार्थ खावे

अमरावती : नवरात्रीचे नऊ दिवस उपवासाची प्रथा आजही बहुतांश महिला, पुरुष पाळतात. अंबानगरीत जागृत अंबादेवीचे ठाण असल्याने नित्यनेमाने पहाटे पूजाअर्चा भाविक करतात. मात्र, उपवासात फळांचा आहार शरीराला साजेसा राहणार असल्याने शाबूदाना टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

अंबापुरी, अंबानगरी असे संबोधले जाणाऱ्या अमरावती शहरात जागृत अंबा, एकवीरादेवीचे मंदिर असल्याने नवरात्रोत्सव हर्षोल्हासात साजरा केला जातो. विदर्भातील नागरिकांचे कुळदैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनाकरिता अत्यंत व्यस्त असलेले भाविक नवरात्रात आवर्जून येतात. त्यानिमित्ताने येथील यात्रेतून आठवण म्हणून खरेदी करतात. ही परंपरा आजही प्रचलित आहे.

दरम्यान, गाढ श्रद्धा असलेले भाविक नऊही दिवस उपवास करून देवीची आराधना करतात. अनेकजण नऊ दिवस विना पादत्राने ठिकठिकाणी फरतात. मात्र, उपवासात शाबूदान्याचा वापर केल्यास ते पचायला जड जाते. त्यामुळे कमी खाणे, तेही पचनास सुकर असलेली फळे, भगर आदींचा वापर केल्यास शारीरिक व्याधी वाढण्यापासून रोखता येऊ शकते, असे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख यांनी सांगितले.

हे पदार्थ खाल्लेले बरे

उपवासात फळ, भाज्या व फळांचा रस सेवन करावे. शाबूदाणा खीर, भगर खीर यातून प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळते. आतील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे, असे आहारतज्ज्ञ रसिका राजनेकर यांनी सांगितले.

शाबूदाणा खाल्ल्याने काय त्रास होऊ शकतो?

शाबूदाणा हे अनेक प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे त्यापासून बनिवलेले विविध पदार्थ खान्यास बरे वाटत असले तरी ते पचनास त्रासदायक ठरतात. मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींना तो पचवताना जड जातो. पोट साफ होत नसल्याने व्याधी जडतात, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शरीर थकेल अशी कामे टाळावी

नवरात्राच्या या नऊ दिवसात उपवास करीत असल्याने नेहमीप्रमाणे काम करू नये. शरीत तेवढी कामे करण्याची ऊर्जा निर्माण होत नसल्याने थकवा येऊ शकतो. शरीर अस्वस्थामुळे भोवळ येणे, रक्तदाब कमी-अधिक होण्याचा प्रकार घडू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उपवासात शाबुदाणा खीर, भगर खीर, मिक्स सुकामेवा शेक, चिक्कीचे पदार्थ ड्रायफ्रुट, शेंगदाणा, राजगिरा, मखाना, भगर इडली, पनीर ग्रेव्ही, नारळ पाणी, शिंगाडा अप्पे यातून प्रोटीन्स, मिनरल, अँटीऑक्सिडंट मिळते. हे पदार्थ उपवासात खावे.

- रसिका राजनेकर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स