शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

तळणी येथे शेतकरी महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:17 IST

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे मृत महिलेचे नाव असून ती मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त असायची.वृद्ध महिलेला राजेंद्र तिडके नामक मुलगा असून त्यांनी चार मुलींचे लग्नकार्य केल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा होता. त्यातच मागील ३ ते ४ वर्षांपासून सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला असून पीक हाती न घेता नांगरणी केली होती. त्यातच काही वर्षांपासून राजेंद्र तिडके यांना रक्ताची कमतरतेचा आजार जडल्यामुळे औषधोपचाराचा खर्चही वाढला होता. त्यामुळे घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.१२ डिसेंबर रोजी घरात कुणी नसताना सदर महिलेने ओढणीने दुपारी ३ चे सुमारास गळफास घेतला. यावेळी सून शेतात कामासाठी तर मुलगा, नातवंडे, नातेवाईकांकडे होते. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अन्नपूर्णाबाई घराजवळील श्रीकृष्ण मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा करायची. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच ठाणेदार आर. के. राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून, याप्रकरणी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असाआप्त परिवार आहे. मुलगा व एक नातू यांचे नावे १० एकर शेती आहे. मुलाचे नावे सामूहिक १० एकर शेती सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ३.५० लाख कर्ज, सावकारी ५० हजार उसनवार व इतर ३ लाख, मुलाचे सततचे आजारपण, एक नातीचे विवाह कार्य, मागे मुलगा राजेंद्र (६०), २ विवाहित मुली सून व नातवंडे.

टॅग्स :Farmerशेतकरी